Azadi Ka Amrit Mahotsav : देशासाठी बलिदान देणारी अनेक आंदोलनं प्रकाशझोतात आली नाहीत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
स्वातंत्र्यानंतरही (Freedom) देशाचे रक्षण करत देशासाठी बलिदान दिले, त्यांनाही मी अभिवादन करतो. 75 वर्षात देशाला इथपर्यंत आणणाऱ्या सर्वांना प्रणाम, असे गौरवोद्गार मोदींनी काढले. देश प्रगतीपथावर आहे. यात सर्वांचे योगदान असल्याचे मोदी म्हणाले.
आझादी अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) म्हणजे स्वातंत्र्याच्या ऊर्जेचे अमृत; स्वातंत्र्यलढ्यातील योद्ध्यांच्या प्रेरणेचे अमृत; नवीन कल्पना आणि प्रतिज्ञांचे अमृत आणि आत्मनिर्भरताचे अमृत. त्यामुळे हा महोत्सव म्हणजे राष्ट्राच्या प्रबोधनाचा उत्सव आहे; सुशासनाचे स्वप्न पूर्ण करण्याचा सण आणि जागतिक शांतता आणि विकासाचा उत्सव आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. आझादी अमृत महोत्सव हा उपक्रम 15 ऑगस्ट 2023पर्यंत सुरू राहील. देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्वांना आदरपूर्वक नमन करतो, त्यांना कोटी कोटी वंदन करतो, असे मोदी म्हणाले. स्वातंत्र्यानंतरही (Freedom) देशाचे रक्षण करत देशासाठी बलिदान दिले, त्यांनाही मी अभिवादन करतो. 75 वर्षात देशाला इथपर्यंत आणणाऱ्या सर्वांना प्रणाम, असे गौरवोद्गार मोदींनी काढले. देश प्रगतीपथावर आहे. यात सर्वांचे योगदान असल्याचे मोदी म्हणाले.