AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सावरकर गौरव यात्रेने राहुल गांधींनी उपस्थित केलेले प्रश्न सुटणार का?’, मुख्यमंत्र्यांनाच सवाल

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Mar 28, 2023 | 10:13 PM
Share

VIDEO | राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केल्यानंतर भाजपचं राजकारण सुरु तर सावरकर यात्रेवरून मुख्यमंत्र्यांनाही राष्ट्रवादीच्या खासदाराचा सवाल

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळातून एकच आरोप प्रत्यारोप सुरू आहे. अशातच राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केल्यानंतर भाजपने त्यावरून आता राजकारण सुरु केले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सावरकर यात्रेवरून अमोल कोल्हे यांनी निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. कोल्हापूर दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी राहुल गांधी यांच्यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सावरकर गौरव यात्रेने राहुल गांधींनी लोकसभेत उपस्थित केलेले प्रश्न सुटणार आहेत का असा सवाल उपस्थित केला आहे. तर अमोल कोल्हे यांनी राहुल गांधी यांच्याविषयी बोलताना सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मला आदर आहे. मात्र सध्याच्या काळात सावरकरांकडे मुद्दा घेऊन जाण्यापेक्षा लोकशाहीकडे घेऊन जाण्याची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Published on: Mar 28, 2023 10:13 PM
Follow Us