AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मुख्यमंत्र्यांच्या सावरकर यात्रेने उपस्थित केलेले प्रश्न सुटणार का?”; राष्ट्रवादीच्या खासदाराचा शिंदेंनाच प्रतिसवाल

सावरकर यात्रेवरून अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना छेडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य झाली होती.

मुख्यमंत्र्यांच्या सावरकर यात्रेने उपस्थित केलेले प्रश्न सुटणार का?; राष्ट्रवादीच्या खासदाराचा शिंदेंनाच प्रतिसवाल
| Edited By: | Updated on: Mar 28, 2023 | 9:31 PM
Share

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. काँग्रेस आणि भाजपकडून दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आणि लोकसभेने त्यांची खासदारकी रद्द केल्यामुळे जोरदार वाद सुरू झाला आहे. काँग्रेस आणि भाजपकडून राज्यभर आंदोलन सुरु आहे. तर कोल्हापूर दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी राहुल गांधी यांच्याविषयी बोलताना सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मला आदर आहे.

मात्र सध्याच्या काळात सावरकरांकडे मुद्दा घेऊन जाण्यापेक्षा लोकशाहीकडे घेऊन जाण्याची गरज असल्याचा टोला सावरकरप्रेमींना त्यांनी लगावला आहे.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केल्यानंतर भाजपने त्यावरून आता राजकारण सुरु केले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सावरकर यात्रेवरून अमोल कोल्हे यांनी त्यांना प्रतिसवाल केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सावरकर यात्रेने राहुल गांधींनी लोकसभेत उपस्थित केलेले प्रश्न सुटणार आहेत का असा सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर भाजपवर चहूबाजूनी टीका केली जात आहे. त्यांच्या खासदारकी रद्द झाल्यावरून चाललेल्या राजकारणावरही अमोल कोल्हे यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईची क्रोनोलॉजी तपासण्याची गरज आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईवरून आता लोकशाही जिवंत आहे का हा सवाल आता उपस्थित होत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

सावरकर यात्रेवरून अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना छेडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य झाली होती.

त्यावेळी का यात्रा काढल्या गेल्या नाहीत असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.त्यामुळे कोणत्याही महापुरुषांबद्दल सध्या राजकारण आणू नये असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.