AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेच्या ‘त्या’ नेत्यांना सन्मान का द्यायचा? शिवसेनेच्या महिला नेत्याचं जोरदार टीकास्त्र

| Updated on: Mar 13, 2023 | 3:00 PM
Share

Priyanka Chaturvedi : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. तसंच शिवसेनेच्या नेत्यांवरही त्यांनी टीका केली आहे. पाहा...

नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. तर राहुल गांधी यांचं त्यांनी कौतुक केलं.राहुल गांधी यांनी माफी का मागावी?, असा सवाल प्रियांका चतुर्वेदी यांनी विचारला आहे. “आज आम्ही विजय चौकपर्यंत मार्च काढला. राहुल यांनी भारत जोडो यात्रा काढली. त्यामुळे त्यांना विविध देशात सध्या बोलावलं जात आहे. बदनामीची सुरुवात नरेंद्र मोदी यांनीच केली आहे, असं प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत. महाराष्ट्रात सध्या सुडाचं राजकारण सुरू आहे, असंही प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या आहेत. व्हायरल व्हीडिओ बाबत नको ते आरोप केले जात आहेत. गद्दारांना आम्ही सन्मान का द्यायचा?, असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी विचारला आहे.

Published on: Mar 13, 2023 03:00 PM