AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला?  सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिपण्णी

तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला? सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिपण्णी

| Updated on: Mar 15, 2023 | 12:30 PM
Share

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर कोर्टात सध्या महत्वपूर्ण युक्तीवाद केला जात आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या सर्व प्रकरणावर महत्वपूर्ण टिपण्णी केली आहे. पाहा संपूर्ण व्हीडिओ...

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी महत्वपूर्ण टिपण्णी केलीय. “तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला?”, असा थेट सवाल सरन्यायाधिशांनी शिवसेनेला विचारला आहे. “तीन वर्ष तुम्ही आनंदाने नांदला एका कारणामुळे तुम्ही सरकार पाडलं. तीन वर्षात तुम्ही एकही पत्र लिहिलं नाही. आता एका आठवड्यात 6 पत्र कशी काय लिहिली?”, असंही चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर आज निर्णय येण्याची शक्यता आहे. कोर्टात सध्या महत्वपूर्ण युक्तीवाद केला जात आहे.

Published on: Mar 15, 2023 12:25 PM