“मी कुणाच्याही बाजूची नाही, तर…”; खासदार नवनीत राणा नेमकं काय म्हणाल्या?
पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने मणिपूरचा मुद्दा लावून धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर बोलावं अशी मागणी होत आहे.अविश्वास प्रस्तावावर चर्चेसाठी एकूण 12 तासांचा वेळ देण्यात आला आहे. या प्रस्तावाआधी खासदार नवनीत राणा यांनी सूचक विधान केलं आहे.
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2023 | पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने मणिपूरचा मुद्दा लावून धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर बोलावं अशी मागणी होत आहे. 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान यावर चर्चा होणार. चर्चेच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील. अविश्वास प्रस्तावावर चर्चेसाठी एकूण 12 तासांचा वेळ देण्यात आला आहे. या प्रस्तावाआधी खासदार नवनीत राणा यांनी सूचक विधान केलं आहे. त्या म्हणाल्या की, ” खरंतर मला हसायला येतं. मी कुणाच्याही बाजूची नाही मी महिलांची खासदार आहे. लोकांच्या गरजेचे विषय भरकटून विरोधक भलत्याच गोष्टीवर गोंधळ घालत आहे. यातून त्यांची मानसिकता ओळखा. फक्त त्यांना मोदींचा विरोध करायचा आहे.”
Published on: Aug 08, 2023 02:17 PM
Follow Us
Latest Videos
सुनील तटकरे हे भाजपच्या... खळबळजनक दावा, त्या दीड वर्षाबाबत अंजली...
पंतप्रधानांचा इटली दौरा इतका चर्चेत का? मोंदींकडून इटलीच्या PMला खास..
महिन्याभरात पेट्रोल एवढ्या रुपयांनी महागणार? आव्हाडांनी आकडाच सांगितला
tv9 मराठीच्या बातमीचा इम्पँक्ट, अन्न व औषध प्रशासनाचं कार्यालय उघडलं
