AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदलापूरात NDRF चे पथक दाखल, उल्हासनदीने धोक्याची पातळी ओलांडली...

बदलापूरात NDRF चे पथक दाखल, उल्हासनदीने धोक्याची पातळी ओलांडली…

| Updated on: Jul 25, 2024 | 2:57 PM
Share

मुंबईतील सायन-माटुंगा, चुनाभट्टी, कुर्ला येथे पाणी साचल्याने लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. सकाळपासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. बदलापूरात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे

मुंबई आणि उपनगरात कालरात्रीपासून पुन्हा जोरदार पाऊस सुरु झाला आहे. रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आल्याने ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कार्यालयांना सुटी देण्यात आली आहे. सकाळपासून देखील ठाणे जिल्ह्यात जबरदस्त पाऊस कोसळत आहे. उल्हासनदीने साडे सतरा मीटर ही पुर रेषा ओलांडल्याने बदलापूरात एनडीआरएफची 35 जणांची टीम रवाना झाली आहे. उल्हासनगरातील पेट्रोल पंप देखील पाण्याखाली गेला आहे. कल्याण अशोक नगर परिसर जलमय झाला आहे. वालधुनी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या या अशोक नगरामधील अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. घरामध्ये राहणारे रहिवासी घरे सोडून आपल्या नातेवाईकांकडे गेली आहेत.

 

Published on: Jul 25, 2024 02:54 PM