4 Minutes 24 Headlines : … तर नाराज आमदार सोडून जातील, अजित पवार यांचा इशारा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या मनात कटुता नाही. आम्ही विरोधकांना माफ केलं हाच आमचा बदला असे म्हणत कटुता संपविण्याचे संकेत दिले आहेत
4 Minutes 24 Headlines : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि भाजप शिवसेनेत कटूता आली. त्यानंतर ते आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली होती. त्याला उत्तर देताना भाजपकडून उद्धव ठाकरे यांनी खंजीर खुपसून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत घरोबा केल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर आता फडणवीस-शिंदे यांचे सरकार आले असतानाही पुन्हा एकदा टीका टीपणी सुरूच आहे. मात्र या धुळवडीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या मनात कटुता नाही. आम्ही विरोधकांना माफ केलं हाच आमचा बदला असे म्हणत कटुता संपविण्याचे संकेत दिले आहेत. तर अजित पवार यांनी मंत्रीमंडळ विस्तारावरून शिंदे-फडणवीस यांना आवाहन दिलं आहे. जर मंत्री मंडळाचा विस्तार झाला तर नाराज आमदार सोडून जातील असंही पवार म्हणाले.
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
