Nitesh Rane : उगाच डरकाळी मारु नका, नितेश राणेंनी पुन्हा आदित्य ठाकरेंना डिवचले
निलेश राणे यांनी तर विधीमंडळाच्या पायरीवरील आठवण करु दिली, त्यावेळी म्याव..म्याव चा आवाज काढल्यानंतर सबंध राज्यात त्यांची गोची झाली होती. त्यामुळे आता त्यांनी उगाच डरकाळी माऱ नये असेच राणे यांनी सुनावले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राजकारणात आरोप-प्रत्यारोप हे सुरुच आहेत. आता दहीहंडीच्या दिवशीही राजकारण पाहवयास मिळाले.
मुंबई : राज्यात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात पार पडत असला तरी या कार्यक्रमातही राजकारण पाहवयास मिळाले आहे. अनेकांनी या दिवशी तरी राजकारण नको असे म्हणत आपले राजकीय शेरेबाजी ही सुरुच ठेवली होती. लक्षवेधी ठरली ती वरळी येथील दहीहंडी. आता वरळी ही सर्वांनाच आवडत असल्याची मिश्किल टिपण्णी आ. आदित्य ठाकरे यांनी केली होती. त्याला विरोधकांकडून उत्तर दिले जात आहे. यावेळे निलेश राणे यांनी तर विधीमंडळाच्या पायरीवरील आठवण करु दिली, त्यावेळी म्याव..म्याव चा आवाज काढल्यानंतर सबंध राज्यात त्यांची गोची झाली होती. त्यामुळे आता त्यांनी उगाच डरकाळी माऱ नये असेच राणे यांनी सुनावले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राजकारणात आरोप-प्रत्यारोप हे सुरुच आहेत. आता दहीहंडीच्या दिवशीही राजकारण पाहवयास मिळाले.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम

