अजित पवार यांच्या प्रवेशावर भाजप नेत्याचा खुलासा; म्हणाले, राजकारणात कधी काही घडू शकतं
शेलार यांनी स्पष्टीकरण देताना, केंद्रीय स्तरावर काय चर्चा चालली असेल ती सार्वजनिक करायची नसते. पण राजकारणात कधी काही घडू शकतं असं म्हणत गुगली टाकली आहे
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटींच्या चर्चांना उत आला. त्याचदरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार आशिष शेलार हे थेट दिल्लीला गेल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. यानंतर बावनकुळे हे राज्यात परतले तर शेलार हे थेट कर्नाटक निवडणुकीच्या रणांगणात गेले आहेत. त्यामुळे दिल्लीत नक्की काय झालं असा प्रश्न राज्यातील जनतेला सतावत आहे. यावरून शेलार यांनी स्पष्टीकरण देताना, केंद्रीय स्तरावर काय चर्चा चालली असेल ती सार्वजनिक करायची नसते. पण राजकारणात कधी काही घडू शकतं असं म्हणत गुगली टाकली आहे. तर भारतीय जनता पार्टी आणि शेलार हे कलपोकल्पित गोष्टी करण्यापेक्षी काँक्रीट गोष्टी करून दाखवण्यावर भर देत असतो असे ते म्हणाले.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

