Pakistani Citizens Deported : नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही; व्हिसा रद्द केल्याच्या निर्णयावर नाराजी
India cancels Pakistani visas : भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले असून पाकिस्तानी नागरिकांना परत मायदेशी जाण्याच्या सूचना केल्या आहेत. या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती. या घटनेनंतर पाकिस्तानच्या विरोधात देशभरातून एकच संतापाची लाट उसळली आहे. तर जगभरातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. या घटनेनंतर भारत सरकारने पाकिस्तानच्या विरोधात कडक निर्णय घेतले. यात सिंधु जल करार स्थगिती बरोबरच पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा देखील रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना भारतातून पुन्हा त्यांच्या देशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या नागरिकांना पाकिस्तानात जाण्याची इच्छा नसल्याच बघायला मिळत आहे. या निर्णयावर पाकिस्तानी नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरच्या पोलिसांकडून याबाबत अधिक माहिती देण्यास नकार देण्यात आला आहे.

नाशिकमध्ये अवकाळीचा कहर; भाजीपाला सडला, शेतकरी हवालदिल

हेच ते बंकर, जमिनीपासून 15 फूट खोल, जिथून भारतीय सैन्याची शत्रूवर नजर

स्वतःची इभ्रत स्वतः राखली पाहिजे; आंबेडकरांचा सरन्यायाधीशांना सल्ला

पंढरपूर मंदिर समितीकडून भाविकांचा अपमान, विठुरायाचे हार कचऱ्यात अन्...
