AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India - Pakistan Conflict : भारताकडून पेजर हल्ला होण्याची भेदरलेल्या पाकिस्तानला वाटतेय भीती

India – Pakistan Conflict : भारताकडून पेजर हल्ला होण्याची भेदरलेल्या पाकिस्तानला वाटतेय भीती

| Updated on: May 01, 2025 | 4:13 PM

घाबरलेल्या पाकिस्तानकडून नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पाकिस्तानकडून नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हल्ला किंवा आपत्तीजनक परिस्थितीत अलर्ट करण्यासाठी हा सायरन बसवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे केवळ भारताकडून होणाऱ्या हल्ल्याच्या विचाराच्या भीतीने पाकिस्तानची झोप उडलेली आहे. खैबर पख्तूनख्व्वा यांच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान पाकिस्तानला आता लेबनॉन प्रमाणे हल्ल्याची भीती वाटते आहे. पाकिस्तानी विश्लेषक जावेद चौधरी याने पाकच्या नागरिकांना हा इशारा दिला आहे. 24 तासातून एकदा नागरिकांनी आपले फोन बंद करावेत असं जावेद चौधरीने सांगितलं आहे. भारत डिजिटल हल्ला करू शकतो असंही त्याने म्हंटलं आहे.

Published on: May 01, 2025 04:12 PM