AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati News : विश्रोळी धरणात प्रहारच्या कार्यकर्त्यांचं जलसमाधी आंदोलन

Amravati News : विश्रोळी धरणात प्रहारच्या कार्यकर्त्यांचं जलसमाधी आंदोलन

| Updated on: Jun 10, 2025 | 2:51 PM

Prahar Activist Protest : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी विश्रोळी येथील जलाशयात जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे.

अमरावतीच्या विश्रोळी धरणात प्रहारकडून जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हे जलसमाधी आंदोलन करण्यात आलं आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पूर्णा मध्यम प्रकल्पाच्या विश्रोळी येथील जलाशयात आज जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गुरूकूंज मोझरी येथे गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. मात्र या आंदोलनाची दखल अद्यापही शासनाने घेतलेली नाही. त्यामुळे बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जलाशयात उड्या घेतल्या, असे प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रहारचे पंधरा ते वीस कार्यकर्ते पूर्णा धरणाच्या जलाशयात घोषणा देत उभे आहेत.

Published on: Jun 10, 2025 02:51 PM