Pravin Darekar : आता का नाकानं कांदे सोलत आहात? याकुब मेमन कबरीच्या राजकारणावरून प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा
याकुब मेमनच्या कबरीवरून राज्यात राजकारण सुरू झाले आहे. यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
मुंबई : याकुब मेननच्या कब्रीचे उदात्तीकरण करून आता तुम्ही नाकानं कांदे कशाला सोलत आहात, असा सवाल प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी करत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) या रौफ मेमनला कशाला भेटल्या, असे दरेकर यांनी विचारले आहे. याकुब मेमनच्या कबरीवरून राज्यात राजकारण सुरू झाले आहे. यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दसरा मेळाव्यावरही त्यांनी मत व्यक्त केले आहे. बाळासाहेबांचे विचार राज ठाकरेच (Raj Thackeray) ताकदीने मांडू शकतात. बाळासाहेब ठाकरे वर्षानुवर्ष अशा सभा घ्यायचे. तर शिंदे गट हा बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारा पक्ष आहे. व्यक्तीपेक्षा, पक्षापेक्षा बाळासाहेबांचे विचार हे पुढे गेले पाहिजेत. राज ठाकरे यांना बाळासाहेब जवळून माहिती आहेत. इतरांच्या तुलनेत ते कधीही बेस्ट आहेत, असे दरेकर म्हणाले.
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
