शिरूरमध्ये पावसाचं थैमान! कांदा पिकाचं मोठं नुकसान, शेतकरी चिंतेत
शिरूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे कांदा पिकाला मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने लागवड केलेले कांद्याचे पीक पाण्याने वाहून गेले आहे. सहा ते सात एकरवरील कांदा पिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. शेतकरी शासनाकडून मदत आणि नुकसानीची भरपाईची मागणी करत आहेत.
पुण्यातील शिरूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कांदा पिकाला मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, काल सायंकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेला पावस अजूनही सुरू आहे. या पावसामुळे सहा ते सात एकरवरील कांद्याचे पीक पाण्याने वाहून गेले आहे. शेतकऱ्यांनी बी- लागवड, खत आणि राण बांधण्यासाठी मोठा खर्च केला होता. त्यांच्या मेहनतीचे फळ पाण्याने वाहून गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. ते शासनाकडून मदत आणि नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी करत आहेत. या घटनेची नोंद घेऊन शासनाने मदत करावी अशी अपेक्षा आहे.
Published on: Sep 15, 2025 01:22 PM
Follow Us
Latest Videos
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..

