‘माझे बाबा, आजी-आजोबांचं रक्त सांडलंय इथं’ असं म्हणणाऱ्या राहुल गांधींना मोदींनी नेहरुंच्या शब्दातच सुनावलं!
माझ्या आजी आजोबांचं, बाबांचं रक्त सांडलंय इथं, असं म्हणत त्यांनी देशाला विभागण्याचं काम भाजपकडून करत असल्याची टीका राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात केली होती. त्याला नरेंद्र मोदी यांनी धन्यवाद प्रस्ताव सादर करताना लोकसभेत उत्तर दिलंय.
2 फेब्रुवारीला लोकसभेत राहुल गांधी (Rahul Gandhi in Loksabha) यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी भाजप सरकार आणि आरएसएसवर तिखट शब्दांत समाचार घेतला होता. माझ्या आजी आजोबांचं, बाबांचं रक्त सांडलंय इथं, असं म्हणत त्यांनी देशाला विभागण्याचं काम भाजपकडून करत असल्याची टीका राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात केली होती. त्याला नरेंद्र मोदी यांनी धन्यवाद प्रस्ताव सादर करताना लोकसभेत उत्तर दिलंय. चक्क नेहरुंच्या (Nehru) वक्तव्याचा दाखल देत राहुल गांधी यांचे मुद्दे नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी खोडून काढलेत. 2 फेब्रुवारीला केलेल्या राहुल गांधी यांच्या आरोपांना मोदींनी सात फेब्रुवारीला केलेल्या लोकसभेतील संबोधनात उत्तर दिलं आहे. नेहरुंनी केलेली वक्तव्य नेमकी कोणती होती, ज्याचा आधार घेत राहुल गांधी यांना मोदींनी सुनावलं, ते जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ…
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?

