पश्चिम विदर्भात हलक्या सरीचा पाऊस
हिंदी महासागरात चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाल्यामुळे पश्चिम विदर्भात हलक्या सरीचा पाऊस झाला आहे. या वातावरणामुळे विदर्भातील पिकांना फटका बसणार असल्याचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.
हिंदी महासागरात चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाल्यामुळे पश्चिम विदर्भात हलक्या सरीचा पाऊस झाला आहे. या वातावरणामुळे विदर्भातील पिकांना फटका बसणार असल्याचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले. पुढील दोन तीन दिवसातही हलक्या पावसाची दाट शक्यता असून या हवामानाच पिकांवर अनिष्ठ परिणाम होणार आहे. यवतमाळ, अमरावतीमध्ये परिसरात या हवामानाचा फटका बसण्याची शक्यता असून त्याआधीच शेतकऱ्यांनी पिकांवर औषध फवारणी करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. त्यानंतर 25 फेब्रुवारी नंतरही दोन दिवस हलक्या सरीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा सगळ्यात जास्त फटका गहू, हरभरा आणि संत्रा पिकाला बसण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

