AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत मोठ्या...

मला भीती वाटते की… राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत मोठ्या…

| Updated on: Sep 06, 2026 | 12:17 PM
Share

राज ठाकरे यांनी आगामी गणेशोत्सवात दंगली घडवल्या जाण्याची भीती व्यक्त केली आहे. देशाची आर्थिक परिस्थिती ढासळलेली असून, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ५०३ परदेशी कंपन्यांनी भारतातील कामकाज बंद केल्याचे सांगत, जनतेला जातीय-धार्मिक विवादांमध्ये गुंतवून मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी गणेशोत्सवामध्ये दंगली घडवल्या जाण्याची भीती व्यक्त केली आहे. ही भीती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून देशभरात दंगली घडवल्या जातील असा इशारा त्यांनी दिला. जनतेला दंगलीमध्ये अडकवून इतर महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न असेल असे त्यांचे म्हणणे आहे. ठाकरे यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीवरही तीव्र चिंता व्यक्त केली. जीडीपी वाढीचे आकडे सांगत असले तरी, देशाची खरी आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे.

बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, सन २०२१ ते २०२६ या काळात ५०३ परदेशी कंपन्यांनी भारतातील त्यांचे कामकाज बंद केले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या गेल्या असल्याचा दावा त्यांनी केला. लोकांना जाती आणि धर्माच्या वादात गुंतवून मूळ प्रश्नांवरून त्यांचे लक्ष हटवले जात आहे असे ठाकरे यांनी म्हटले आहे. सुजाण हिंदू आणि सुजाण मुस्लिमांनी सतर्क राहावे असे आवाहनही त्यांनी केले.

Published on: Sep 06, 2026 12:17 PM

Follow Us