“शरद पवार यांच्या सहमतीने अजितदादाचं बंड”, पाहा नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्या निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते राज ठाकरे यांनी खळबळजनक विधान केलं आहे.
मुंबई: अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्या निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते राज ठाकरे यांनी खळबळजनक विधान केलं आहे. महाराष्ट्राचं राजकारण दिवसेंदिवस किळसवाण होत चाललं आहे. “अजित पवार यांच्या बंडाशी माझा काही संबंध नाही, असं शरद पवार म्हणत असले तरी दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे असेच जाणार नाहीत हे लक्षात घ्या. ते पाठवल्याशिवाय जाऊच शकत नाहीत. उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्यातरी मला आश्चर्य वाटणार नाही. कशाला काही सोयरसुतक राहिलं नाही. हा सर्व ड्रामा आहे. पहाटेच्या शपथविधीने सुरुवात झाली. नंतर राष्ट्रवादी-शिवसेना झाली. आता शत्रू कोण आणि मित्र कोण महाराष्ट्रात राहिलंच नाही,” असं ते म्हणाले.
.
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या

