म्हणून मी शिवसेना सोडली, बाळासाहेबांना लिहिलेल्या 7 पानी पत्रात राणेंनी काय म्हटलं?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात भाजपचे उमेदवार नारायण राणेंनी आपला जोरदार प्रचार सुरू केला आहे. रत्नागिरीतील प्रचारसभेत बोलताना नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली तर शिवसेना सोडण्यामागचं खरं कारणही त्यांनी बोलून दाखवलं. बघा काय म्हणाले नारायण राणे?

म्हणून मी शिवसेना सोडली, बाळासाहेबांना लिहिलेल्या 7 पानी पत्रात राणेंनी काय म्हटलं?
| Updated on: May 01, 2024 | 4:53 PM

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होणार असून या टप्प्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात मतदान होणार आहे. दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात भाजपचे उमेदवार नारायण राणेंनी आपला जोरदार प्रचार सुरू केला आहे. रत्नागिरीतील प्रचारसभेत बोलताना नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली तर शिवसेना सोडण्यामागचं खरं कारणही त्यांनी बोलून दाखवलं. नारायण राणेंनी एक किस्सा सांगताना असे म्हटले की, बाळासाहेबांना 7 पानी पत्र दिले आणि उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना सोडली. उद्धव ठाकरे आणि माझं जमणार नाही अस साहेबांना सांगितलं, असं सांगतानाच बाळासाहेब ठाकरेंमुळे मी घडलो. ह्याचं दुकान बंद केलं पाहिजे. आता चूक करू नका. तुमचं आमचं तरुण पिढीच भवितव्य बदलायचं असेल तर मोदींना मतं द्या, असं आवाहन राणेंनी केलं. तर ठाकरेंवर टीका करताना राणे म्हणाले, उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत यांना प्रत्येक कामात पैसे पाहिजेत. मोदी, शाह आणि फडणवीस यांच्यावर टीका करता. तुम्ही अडीच वर्षात काय झक मारली ते पाहा. तू केवढा आहेस? जनाची नाय तर मनाची तरी लाज बाळग. योगायोगाने हिंदुत्वाशी गद्धारी करून शरद पवार यांच्या मांडीवर बसून मुख्यमंत्री झालास, असे म्हणत नारायण राणेंनी हल्लाबोल केला.

Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.