रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुरांसाठी 25 हजारांची मागणी
वाशिममध्ये नुकसानीची पाहणी केल्यानंतर रोहित पवारांनी शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 50 हजार रुपये आणि शेतमजुरांसाठी 25 हजार रुपये मदतीची मागणी केली आहे. चारा छावण्या तात्काळ सुरू कराव्यात, जाहीर केलेली कर्जमाफी त्वरित लागू करावी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचा सरकारने विचार करावा, असेही पवार म्हणाले.
वाशिम येथे नुकसानीची पाहणी केल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी आणि शेतमजुरांसाठी तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. रोहित पवारांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली असता, शेतकऱ्यांनी त्यांना कमीत कमी हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत सरकारकडून तातडीने मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. याशिवाय, शेतमजूर वर्गाने पीक नसल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांना कुटुंबासाठी 25 हजार रुपयांची मदत दिली जावी, अशी मागणी पवारांनी केली.
चारा छावण्या लवकरात लवकर सुरू करण्याची गरजही पवारांनी अधोरेखित केली. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाहीर केलेली कर्जमाफी तातडीने लागू होणे आवश्यक आहे. अनेक शेतकरी कुटुंबातील मुले नागपूर, पुणे किंवा इतर शहरांमध्ये शिक्षणासाठी जातात. त्यांची फी भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे सध्या पैसे नाहीत. त्यामुळे सरकारने या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचाही विचार करावा, अशा विविध मागण्या रोहित पवारांनी सरकारकडे केल्या आहेत.
Published on: Sep 15, 2026 01:37 PM
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार

