सागरमाला योजनेअंतर्गत जलवाहतुकीचा विकास, ‘या’ मार्गावर सुरू होणार रो-रो सेवा
VIDEO | मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी मेट्रो रेल्वेबरोबरच जलवाहतुकीचा पर्याय, मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर नवी मुंबई, ठाणे-कल्याण, मुंबई-अलिबाग अशा प्रवासी जलवाहतुकीसाठी 1 हजार 133 कोटींचा निधी
मुंबई, १४ ऑगस्ट २०२३ | राज्याला लाभलेल्या मोठ्या किनाऱ्याचा फायदा घेण्यासाठी किनारपट्टीवरील जलवाहतुकीला चालना देण्यासाठी सागरमाला हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आखण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत १ हजार १३३ कोटी रूपयांचे तब्बल ३४ प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. नवी मुंबई, ठाणे-कल्याण, मुंबई-अलिबाग अशा मार्गावर ही रोरो सेवा सुरू करण्यात येणार आहे. मुंबईतल्या वाढत्या वाहतूककोंडीवर मात करण्याठी मेट्रो रेल्वेबरोबरच जलवाहतुकीचा पर्याय शोधण्यात येत आहे. त्यासाठी मुंबई व आसपासच नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, मीरा- भाईंदर शहरांभोवती जलवाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या योजनेसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडून प्रत्येकी ५० टक्के निधी देण्यात येतो. या योजनेत वसई, ठाणे-कल्याण या राष्ट्रीय जलमार्ग ५३ मध्ये जलवाहतुकीसाठी पहिल्या टप्प्यात भाईंदर, कोलशेत, काल्हेर व डोंबिवली या चार ठिकाणी प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने जेटी व इतर सुविधा निर्माण करण्यासाठी ११९ कोटी ३८ लाख रुपयांच्या खर्चासाठी प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. त्यासाठी ‘महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट’कडून पर्यावरणाचा दाखलाही दिला आहे.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन

