राज ठाकरे यांनी तरुणांची माफी मागावी; कुणी आणि का केली मागणी?
राज ठाकरे यांनी तरुणांची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आलीय. ही मागणी कुणी आणि का केलीय? वाचा...
राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या कालच्या एका मुलाखतीदरम्यान केलेल्या विधानावर आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी टीका केलीय. “राज ठाकरे यांनी एका मुलाखतीदरम्यान बोलताना एखाद दुसरा उद्योग राज्याबाहेर गेल्याने महाराष्ट्राचं नुकसान होत नाही, असं म्हटलं. परंतु याच विधानामुळे राज ठाकरे यांचा महाराष्ट्र राज्याचा किती अभ्यास आहे. हे स्पष्टपणे दिसून येत आहे राज ठाकरे यांना अजूनही महाराष्ट्र समजलेला नाही. राज्यामध्ये शिंदे आणि फडणवीस सरकार आहे तर राज ठाकरे यांना बेरोजगार मुले दिसत नाहीत त्यामुळे राज ठाकरे यांनी जे वक्तव्य केलेला आहे या अत्यंत चुकीचे वक्त आहे या वक्तव्याबद्दल तात्काळ त्यांनी राज्यातील बेरोजगार मुलांची माफी मागावी”, असं सचिन खरात (Sachin Kharat) म्हणालेत.
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा...
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग
