AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे यांनी तरुणांची माफी मागावी; कुणी आणि का केली मागणी?

राज ठाकरे यांनी तरुणांची माफी मागावी; कुणी आणि का केली मागणी?

| Updated on: Jan 09, 2023 | 11:49 AM
Share

राज ठाकरे यांनी तरुणांची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आलीय. ही मागणी कुणी आणि का केलीय? वाचा...

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या कालच्या एका मुलाखतीदरम्यान केलेल्या विधानावर आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी टीका केलीय. “राज ठाकरे यांनी एका मुलाखतीदरम्यान बोलताना एखाद दुसरा उद्योग राज्याबाहेर गेल्याने महाराष्ट्राचं नुकसान होत नाही, असं म्हटलं. परंतु याच विधानामुळे राज ठाकरे यांचा महाराष्ट्र राज्याचा किती अभ्यास आहे. हे स्पष्टपणे दिसून येत आहे राज ठाकरे यांना अजूनही महाराष्ट्र समजलेला नाही. राज्यामध्ये शिंदे आणि फडणवीस सरकार आहे तर राज ठाकरे यांना बेरोजगार मुले दिसत नाहीत त्यामुळे राज ठाकरे यांनी जे वक्तव्य केलेला आहे या अत्यंत चुकीचे वक्त आहे या वक्तव्याबद्दल तात्काळ त्यांनी राज्यातील बेरोजगार मुलांची माफी मागावी”, असं सचिन खरात (Sachin Kharat) म्हणालेत.