राज ठाकरे यांनी तरुणांची माफी मागावी; कुणी आणि का केली मागणी?
राज ठाकरे यांनी तरुणांची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आलीय. ही मागणी कुणी आणि का केलीय? वाचा...
राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या कालच्या एका मुलाखतीदरम्यान केलेल्या विधानावर आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी टीका केलीय. “राज ठाकरे यांनी एका मुलाखतीदरम्यान बोलताना एखाद दुसरा उद्योग राज्याबाहेर गेल्याने महाराष्ट्राचं नुकसान होत नाही, असं म्हटलं. परंतु याच विधानामुळे राज ठाकरे यांचा महाराष्ट्र राज्याचा किती अभ्यास आहे. हे स्पष्टपणे दिसून येत आहे राज ठाकरे यांना अजूनही महाराष्ट्र समजलेला नाही. राज्यामध्ये शिंदे आणि फडणवीस सरकार आहे तर राज ठाकरे यांना बेरोजगार मुले दिसत नाहीत त्यामुळे राज ठाकरे यांनी जे वक्तव्य केलेला आहे या अत्यंत चुकीचे वक्त आहे या वक्तव्याबद्दल तात्काळ त्यांनी राज्यातील बेरोजगार मुलांची माफी मागावी”, असं सचिन खरात (Sachin Kharat) म्हणालेत.
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील

