Saamna Editorial | कोरोनाबळींच्या मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करा, ‘सामना’तून फडणवीसांना सल्ला
महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने मोदींना भेटण्याची वा पत्र लिहिण्याची गरज महाराष्ट्रासारख्या राज्यातील विरोधी पक्ष सक्षम व जागरूक आहे. त्यांनी पंतप्रधानांना भेटून किंवा पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाने सुचवल्याप्रमाणे कोरोनाग्रस्त कुटुंबास मदत करावी असे नम्रपणे सांगायला हवे, असा टोला सामना अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.| Saamna Editorial Advise To Maharashtra BJP To Aksed Help For Corona Victims To Central Government
कोरोना बळींच्या वारसांना आर्थिक मदत देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे, असे सर्वोच्च न्यायालयानेच सांगितले आहे. कोरोना ही आपत्ती आहेच. ती राष्ट्रीय की नैसर्गिक हे सरकारने एकदा ठरवले तर बरे होईल. सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शन केलेच आहे. जनतेला दिलासा देण्याचे काम केंद्र सरकारचेच आहे. लाखो लोक मेले, तितकेच अनाथ आणि निराधार झाले. नुकसानभरपाईच्या मलमपट्टीने जखमेचा घाव भरायला मदत होईल. माणुसकीचा धर्म हेच सांगतो, असं अग्रलेखात म्हटलं आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने मोदींना भेटण्याची वा पत्र लिहिण्याची गरज
महाराष्ट्रासारख्या राज्यातील विरोधी पक्ष सक्षम व जागरूक आहे. त्यांनी पंतप्रधानांना भेटून किंवा पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाने सुचवल्याप्रमाणे कोरोनाग्रस्त कुटुंबास मदत करावी असे नम्रपणे सांगायला हवे, असा टोला सामना अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. कोरोनाबळींच्या मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करा, असा सल्लाही ‘सामना’तून देवेंद्र फडणवीसांना देण्यात आला आहे. | Saamna Editorial Advise To Maharashtra BJP To Aksed Help For Corona Victims To Central Government