पहाटे शपथ घेतली अन् आता सोबत न यायला काय झालं?; सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया
Sadabhau Khot on Ajit Pawar : अजित पवार भाजपसोबत येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यावर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...
पुणे : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यावर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे पहाटेचे शपथ घेऊन आले आहेत. मग पुन्हा सोबत न यायला काय झालं? राजकारणात कुणीही कुठेही जाऊ शकतो, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. राजकारण हा एक गोंधळ आहे. वातावरण तयार करण्यासाठी हे सगळे लोक गोंधळ घालत आहेत. राष्ट्रवादीचे लोक देखील असंच वातावरण तयार करतात. म्हणजे पुढे पक्षांतर करायचं असेल तर ते सोपं जातं. हे फक्त वातावरण तयार केलं जात आहे. महाराष्ट्राचं राजकारण हा पोरखेळ आणि चेष्टेचा विषय झाला आहे. त्याच्यावर न बोललेलं बरं, असंही सदाभाऊ म्हणाले आहेत.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

