Sanjay Raut On Eknath Shinde | शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
मुंबई महापालिकेतील प्रशासकीय कारभाराच्या काळात काढण्यात आलेल्या सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या टेंडरला रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, “भ्रष्टाचारमुक्त मुंबई” हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई महापालिकेतील प्रशासकीय कारभाराच्या काळात काढण्यात आलेल्या सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या टेंडरला रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, “भ्रष्टाचारमुक्त मुंबई” हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना राऊत यांनी या प्रकरणावरून थेट एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. “प्रशासकीय काळात महानगरपालिकेचा कारभार नगरविकास मंत्र्यांकडे असतो. त्या वेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे होते. त्यामुळे त्या काळातील प्रशासन त्यांच्या नियंत्रणाखाली होते,” असे राऊत यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, गेल्या साडेतीन वर्षांत मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत. “महानगरपालिकांच्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता दिसून आली,” असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, एक हजार कोटींपेक्षा अधिक रकमेचे टेंडर भ्रष्टाचाराच्या संशयावरून रद्द करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी मुंबई महानगरपालिकेच्या विद्यमान आयुक्तांचे कौतुक केले. “या निर्णयाबद्दल आयुक्तांचे अभिनंदन केले पाहिजे,” असे म्हणत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेचे समर्थन केले. या घडामोडीमुळे मुंबई महापालिकेतील कामकाज आणि मागील काळातील निर्णयांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा

