हे सरकार पडणारच! सत्तासंघर्षाच्या निकालाआधी नरहरी झिरवळ यांचा सर्वात मोठा दावा
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याआधीच नरहरी झिरवळ यांनी मोठा दावा केला आहे.
मुंबई : गुरुवारी सुप्रीम कोर्ट ( Supreme Court ) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल देणार आहे. या निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून असणार आहे. कारण या निकालानंतर राजकारणाची दिशा बदलू शकते. महाराष्ट्रातील राजकारणाला ( Maharashtra Politics ) एक वेगळं वळण लागू शकतं. एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र घोषित ( 16 Mla Disqualification Case) करण्याची मागणी ठाकरे गटाने ( Thackeray Group ) कोर्टात केली आहे. यावर आता कोर्ट काय निर्णय देतं याकडे लक्ष लागून आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय य़ेण्याआधी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ ( Narhari Zirval ) यांनी टीव्ही ९ मराठीवर प्रतिक्रिया दिली आहे. मी घेतलेला निर्णय योग्यच आहे. असं त्यांनी म्हटले आहे.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

