हे सरकार पडणारच! सत्तासंघर्षाच्या निकालाआधी नरहरी झिरवळ यांचा सर्वात मोठा दावा
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याआधीच नरहरी झिरवळ यांनी मोठा दावा केला आहे.
मुंबई : गुरुवारी सुप्रीम कोर्ट ( Supreme Court ) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल देणार आहे. या निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून असणार आहे. कारण या निकालानंतर राजकारणाची दिशा बदलू शकते. महाराष्ट्रातील राजकारणाला ( Maharashtra Politics ) एक वेगळं वळण लागू शकतं. एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र घोषित ( 16 Mla Disqualification Case) करण्याची मागणी ठाकरे गटाने ( Thackeray Group ) कोर्टात केली आहे. यावर आता कोर्ट काय निर्णय देतं याकडे लक्ष लागून आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय य़ेण्याआधी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ ( Narhari Zirval ) यांनी टीव्ही ९ मराठीवर प्रतिक्रिया दिली आहे. मी घेतलेला निर्णय योग्यच आहे. असं त्यांनी म्हटले आहे.
शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील तर... सपकाळ यांच्याकडून दिलगिरी
मॅक्रॉन यांच्या स्वागतासाठी पोस्टरबाजी, राऊत आणि भाजपमध्ये जुंपली
अजित पवारांचं विमान बनवलं त्या देशातून माहिती मागवली
कुणाल कामरा विधानभवनात चौकशीसाठी हजर! पुढची सुनावणी 10 मार्चला

