Shiv Jayanti 2025 : औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट
शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेला बाळ शिवबा हा अवघ्या जनतेचा राजा झाला. शिवरायांचं नाव घेतलं की अनेक लढाया आणि त्यांच्या पराक्रमांचा जाज्वल्य इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो. शिवराय आग्रातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरुन बघा EXCLUSIVE रिपोर्ट
संपूर्ण भारताचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395 वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं साधं नाव जरी अंगात जोश संचारतो. शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेला बाळ शिवबा हा अवघ्या जनतेचा राजा झाला. शिवरायांचं नाव घेतलं की अनेक लढाया आणि त्यांच्या पराक्रमांचा जाज्वल्य इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो. स्वराज्याची उभारणी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनात अनेक संकटे आलेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका ही मराठ्यांच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची घटना म्हणून सांगितली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांची काही संकटे अशी होती की महाराज त्या संकटातून सहिसलामत सुखरूप बाहेर पडतील की नाही याबद्दलही शंका होती. 17 ऑगस्ट 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराज हे युवराज संभाजी महाराजांसह आग्र्याच्या किल्ल्यातून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन यशस्वीरित्या पसार झाल्याचा इतिहास आहे. शिवराय आग्रातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरुन बघा EXCLUSIVE रिपोर्ट
Published on: Feb 19, 2025 05:26 PM
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
