कांद्याप्रकरणी राज्यातील मंत्री लाचार झालेत, खासदार अमोल कोल्हे यांची घणाघाती टीका
शेतकरी आक्रोश मोर्च्याचा समारोप आज झाला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाषण करताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली. जरा कुठे कांद्याला भाव मिळायला लागले की शेतकऱ्यांच्या ताठात सरकारने माती कालवली असल्याचेही अमोल कोल्हे यांनी यावेळी म्हटले आहे.
पुणे | 30 डिसेंबर 2023 : अफझल खानाने तुळजाभवानी मंदिरावर घण घातला त्यावेळी त्याच्या सैन्यातील मराठा सरदार काही करू शकले नाहीत. कारण त्यांनी मांडलिकत्व पत्करलेले होते. तसेच राज्यातील सत्ताधारी मंत्री केंद्रातील सत्तेचे मांडलिकत्व पत्करलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधातले निर्णय घेतलेले जात असतानाही ते मान खाली घालून बसले आहेत अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चात केली आहे. देशातील जनतेला कृषी मंत्र्याचे नाव देखील माहीती नाही. आज कृषीप्रधान देशाला कृषीमंत्री नाही. देशातील जनतेला कृषीमंत्री म्हणून शरद पवार यांची आठवण येते, याचा अर्थ पवार यांच्या कामाचा ठसा नऊ वर्षांनंतरही पॉवरफूल सरकारला ठसा पुसता आलेला नाही असेही अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....

