AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यमदुताने खोटं बोलण्यासाठी काही लोकांची नियुक्ती केली; राऊतही यांच्यातीलच एक, भाजप नेत्याची सडकून टीका

यमदुताने खोटं बोलण्यासाठी काही लोकांची नियुक्ती केली; राऊतही यांच्यातीलच एक, भाजप नेत्याची सडकून टीका

aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: May 10, 2023 | 8:38 AM
Share

मागच्या पाच वर्षात गुजरातमधून तब्बल 40 हजार मुली बेपत्ता झाल्याची अधिकृत माहिती असून याला कोण जबाबदार? असा सवाल सामना अग्रलेखातून करताना केंद्रावर टीका करण्यात आली होती.

नांदेड : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून देशभरात वाद सुरू असून तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यात या चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे. तर भाजपकडून हा प्रोपागंडा चालवण्यात येत असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात येत आहे. पण मागच्या पाच वर्षात गुजरातमधून तब्बल 40 हजार मुली बेपत्ता झाल्याची अधिकृत माहिती असून याला कोण जबाबदार? असा सवाल सामना अग्रलेखातून करताना केंद्रावर टीका करण्यात आली होती. ही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. सामनाच काय करावं हेच मला कळतं नाही. यमदुताने आणि परमेश्वरानं जसं खोटं बोलण्यासाठी काही लोकांची नियुक्ती केली आहे. त्यात सामानातील काही लोकं आहेत. तर संजय राऊत यांची नियुक्तीच त्यासाठी करण्यात आल्याचा घणाघात केला आहे. आमच्या सोबत होते तेव्हा गुजरात मॉडेलवर अग्रलेख लिहले जायचे. मात्र आता विरोध केला जात आहे अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.

Published on: May 10, 2023 08:38 AM
Follow Us