AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ससाने जागा अदानीच्या तोंडात घालतायत! उद्धव ठाकरेची सरकारवर टीका

ससाने जागा अदानीच्या तोंडात घालतायत! उद्धव ठाकरेची सरकारवर टीका

| Updated on: Jan 08, 2026 | 9:33 AM
Share

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या शहरी समस्या, वाढती गर्दी आणि प्रदूषणावर चिंता व्यक्त केली. उद्धव ठाकरेंनी आरे मेट्रो कारशेडच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मुंबईसह महाराष्ट्राच्या मोक्याच्या जमिनी अदानींसारख्या उद्योगपतींच्या घशात घातल्या जात असल्याचा गंभीर आरोप केला.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वाढती गर्दी, पायाभूत सुविधांचे प्रश्न आणि जमिनींच्या गैरवापरावर चिंता व्यक्त केली आहे. आरे मेट्रो कारशेडच्या प्रकल्पावर बोलताना, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सरकारच्या काळात आरेचे संरक्षण केल्याचे सांगितले, तर सध्याच्या सरकारने आरेची कत्तल करून कांजूरमार्गलाही प्रकल्प नेल्याचे म्हटले. मुंबईतील सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या पाण्याची समस्या आणि वाढलेल्या वाहतूक कोंडीकडेही त्यांनी लक्ष वेधले.

ठाकरे बंधूंनी जमिनींच्या मालकी हक्कावरूनही गंभीर प्रश्न उपस्थित केले. केंद्र, राज्य आणि महानगरपालिकेच्या जमिनींचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याचा मुद्दा मांडत, उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील मोक्याच्या जमिनी मोदींच्या आवडत्या उद्योगपतींच्या घशात घातल्या जात असल्याचा आरोप केला. एकेकाळी सब भूमी गोपाल की अशी घोषणा होती, ती आता सब भूमी अदानी की अशी झाल्याचे ते म्हणाले. धारावी, मिठागर, टोलनाके यांसारख्या महत्त्वाच्या जागा एकाच उद्योगपतीकडे गेल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये मराठी माणसाची ताकद येऊन मुंबई वाचवण्याचे आवाहन त्यांनी केले.

Published on: Jan 08, 2026 09:33 AM