Uddhav Thackeray : डोळ्यात अश्रू नाही तर अंगार… उद्धव ठाकरेंची स्फोटक मुलाखत, नकली संतान आरोपांवर दिलं रोखठोक उत्तर
टीव्ही नाईनला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले. मातोश्रीवर दिलेला शब्द मोडल्याने फडणवीसांसाठी दारं बंद असल्याचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. मोदींनी नकली संतान संबोधल्याबद्दल खंत व्यक्त करत, आपल्या डोळ्यांतील अश्रूंना अंगार असल्याचे त्यांनी म्हटले.
टीव्ही नाईनला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक राजकीय मुद्यांवर रोखठोक मते व्यक्त केली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली. मुलाखतीदरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात पाणी तरळले, ज्याला त्यांनी अंगार असे संबोधले. फडणवीसांनी मातोश्रीवर दिलेला शब्द मोडल्याने त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद असल्याचे त्यांनी उघडपणे सांगितले. तसेच, नरेंद्र मोदींनी आपल्याला नकली संतान म्हटल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बाळासाहेब ठाकरे यांनी मोदींना कसे वाचवले याचा दाखला देत, अशी टीका कोणती संस्कृती दर्शवते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपने अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन मोडल्याचा आरोप करत, उद्धव ठाकरे यांनी भाजपने एक चांगला मित्र गमावल्याचे म्हटले. मातोश्रीची बदनामी थांबवल्यास दरवाजे उघडतील, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले...

