Uddhav Thackeray : …नाहीतर रस्त्यावर उतरू, ठाकरेंचा इशारा देत सरकारवर हल्लाबोल, मराठवाड्यात मोदींनी यावं अन्…
लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनीही त्यांच्याकडे कर्जमाफीची मागणी केली. याप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "आज माझ्या हातात काही नाही, परंतु तुम्हाला धीर देण्यासाठी मी आलो आहे. खचून जाऊ नका, मी तुमच्या सोबत आहे."
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी नुकताच दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निर्वाणीचा इशारा दिला. “कर्जमाफी करा, अन्यथा रस्त्यावर उतरू,” असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरत विचारले की, योग्य वेळ कोणती आहे, हे सरकार पंचांग पाहून सांगणार आहे का? उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने सरसकट कर्जमुक्तीची मागणी केली.
सरकारने ही मागणी मान्य न केल्यास, शिवसेना शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला. मराठवाड्यातील परिस्थिती गंभीर असून, पंतप्रधानांनी तातडीने या भागाचा दौरा करावा, अशी मागणीही त्यांनी केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी किमान ४० हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

