‘पैशाचा खेळ करून कोणाही मुख्यमंत्री किंवा देशाचा पंतप्रधानही होऊ शकतो’; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल
त्यांनी त्यांच्या अमरावती दौऱ्यात आधी पत्रकार परिषद आणि त्यानंतर सभेत शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर निशाणा. अमरावतीत विश्राम भवनात आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे
अमरावती : ठाकरे गटाचे प्रमुख तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यात सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे. त्यांनी त्यांच्या अमरावती दौऱ्यात आधी पत्रकार परिषद आणि त्यानंतर सभेत शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर निशाणा. अमरावतीत विश्राम भवनात आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडताना, पूर्वी सरकार हे मतपेटीतून जन्माला यायचं, आता खोक्यातून येतं अशी, खोचक टीका केली आहे. तसेच तुम्ही मतदान कोणालाही करा सरकार माझंच येईल असं बोलणं, तसा पायंडा पाडणं योग्य नाही. तर दमदाट्या किंवा पैशाचा खेळ करून या राज्यात मुख्यमंत्री किंवा देशाचा पंतप्रधान कोणीही होईल असे म्हटलं आहे. त्याचबरोबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘राइट टू रिकॉल’ हे सांगितलं होतं. त्या प्रमाणे लोक प्रतिनिधीला परत बोलवण्याचा अधिकार द्यायला पाहिजे. त्यावर विचार व्हायला हवा असेही त्यांनी म्हटलं आहे.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य

