“बारामतीच्या नेत्यांनी देशाला ब्लॅकमेल करण्याचं काम केलं”, कोणी केली पवार कुटुंबावर टीका?
शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबावर सडकून टीका केली आहे. "बारामती लोकसभा मतदारसंघातील नेत्यांनी देशाला ब्लॅकमेलिंग करायचं काम केलं आहे. आतापर्यंत या मतदारसंघात चुकीच्या लोकांना निवडून देण्यात आलं आहे.
पुणे : शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबावर सडकून टीका केली आहे. “बारामती लोकसभा मतदारसंघातील नेत्यांनी देशाला ब्लॅकमेलिंग करायचं काम केलं आहे. आतापर्यंत या मतदारसंघात चुकीच्या लोकांना निवडून देण्यात आलं आहे. या मतदारसंघाच्या जीवावर देशभर लोकांना यांनी फसवलं. यांनी फक्त बारामतीचा विकास केला. या भागाचा विकास का केला नाही? तुम्ही फक्त बारामती तालुका दाखवता बारामती लोकसभा मतदारसंघ दाखवा. बारामती लोकसभा मतदारसंघात यांना फुकटची मत आता मिळणार नाहीत.बारामती लोकसभा मतदार संघात यांना हरवणं काळाची गरज आहे”, असं विजय शिवतारे म्हणाले. तसेच शिवतारे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. “राऊत यांची थुंकण्याची कृती विक्षिप्त आहे”, असे शिवतारे म्हणाले.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

