‘सरकारला भिती होती म्हणून निवडणुका थांबवल्या?’, वडेट्टीवार यांचा भाजपवर आरोप
गेल्या दोन एक वर्षापासून राज्यात कोणत्याच निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे स्वराज्य संस्था सध्या कोलमडल्या आहेत. तर त्यांच्या निवडणुकांवर सर्वोच्च न्यायालयात सध्या कायदेशीर लढाई सुरू आहे.
मुंबई : 20 ऑगस्ट 2023 | राज्यातील महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुका या झालेल्या नाहित. त्यामुळे येथे सध्या प्रशासक आहे. त्यामुळे तेथे नागरिकांच्या कामांना खो बसत आहे. तर सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण असल्याने या निवडणुका रखडल्या आहेत. तर येत्या काही दिवसात त्यावर निकाल लागून निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. यावरून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी निकाल लागला तर स्वागतच आहे. गेली दिड दोन वर्ष झाली जिल्हा परिषदेला निवडणूका झालेल्या नाहीत. या फक्त सरकारला भिती होती म्हणून थांबवल्या. आता भीती कमी झाली असेल तर घेऊ द्या. आम्ही, महाविकास आघाडीसाठी तयार आहोत. देशातील राज्यातील जनता सगळ्या परिस्थितीमध्ये आमच्या पाठीमागे उभी राहील असा विश्वास आहे.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

