भाजी विकून भज्याचेही पैसे निघेनात, शेतकऱ्यांनी जगायचं कसं?

कोरोना संसर्गात भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला शेताच्या बांधावर सडतोय. Bhandara Vegetable farmer

भाजी विकून भज्याचेही पैसे निघेनात, शेतकऱ्यांनी जगायचं कसं?
भंडाऱ्यातील भाजी उत्पादक शेतकरी अडचणीत
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 7:28 PM

भंडारा: कोरोना संसर्गात भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला शेताच्या बांधावर सडतोय. भाजी विकून भज्याचे पैसेही निघत नसल्याची जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती आहे. मालाला भाव मिळत नसल्याने शिवाय कोरोनामुळे मजूर आणि मार्केट उपलब्ध नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. (Bhandara Vegetable farmer facing economic problem due to lockdown)

भाजीपाला बांधावर सडत ठेवण्याची वेळ

कोरोना संसर्गात भंडारा जिल्ह्यात भाजीपाला पिकाला भाव मिळत नाही. कोरोनामुळे लागलेल्या संचारबंदीमुळे भाजीपाला पिकाला तोडणीसाठी मजूर मिळत नाही. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला शेताच्या बांधावर सडत ठेवण्याची वेळ भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. मजूर मिळत नसून तसेच भाजीपालाला भाव नसल्याने भाजी विकून भज्याचे पैसेही निघत नसल्याची स्थिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली असून भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

भंडारा जिल्हा तसा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. मात्र, अलीकडे पाण्याच्या उपलब्धतेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेण्यास सुरु केले आहे. आधुनिक तंत्रज्ञात व उपलब्ध बाजारपेठ यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मागील 6-7 वर्षा पासून भाजीपाला पीक घेऊ लागला. मात्र, कोरोनाच्या संसर्ग वाढू लागला लॉक डाउन लागले व भाजीपाला पिकाला भाव मिळेनासा झाला. एकीकडे लॉकडाऊन लागू होऊन संचारबंदी केल्याने भाजीपाला तोडण्यास मजूर मिळेनासे झाले आहेत. तर दुसरीकडे उत्पादन केलेल्या मालाला भाव मिळत नसल्याने तोडणी खर्च परवडत नसल्याने भाजीपाला पीक शेताच्या बांधावर सडत ठेवण्याची वेळ जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.

वांगी 5 रुपये किलो भेडी 10 रुपये किलो

ठोक दरात वांगी 5 रु किलो,भेंडी दहा रुपये किलो,कारले 12 रु किलो,टोमैटो 4 रु किलो,चवळी 10 रु किलो अशा कमी दरात विकली जात असल्याने दहा किलो वांगी विकुन भजी खाण्याइतके पैसे निघत नसल्याने जिल्ह्यातील भाजीपाला पीक घेणारा शेतकरी चिंतेत सापडला आहे. तोडणीची मजुरी, वाहतुकीचा खर्च व बाजारातील भाव यांचे गणित लागत नसल्याने शेतात भाजीपाला पिक सडू देण्याशिवाय पर्याय शेतकऱ्यांना नसल्याची परिस्थिती असल्याचं जांब येथील किरण अतकरी या भाजीपाला पीक उत्पादक शेतकऱ्यांनं सांगितलं आहे.

कोरोना संसर्गाचा फटका राज्यातील सर्वच क्षेत्राला बसला असल्याचे चित्र उभे असताना आता त्याची झळ शेतकऱ्यांला बसत असल्याचे समोर येऊ लागले आहे. त्यामुळे इतरांप्रमाणे शेतकऱ्यांना देखील मदत द्यावी, असं कुँवर श्रीपात्रे यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

मुंबई, ठाण्यातील शाळा बंद, मग उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थी-पालकांची काळजी सरकारला नाही का? भाजपचा सवाल

BHARAT BAND | शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’चा देशभरात परिणाम, कुठे परिक्षा रद्द, रेल्वे अडवल्या, तर कुठे नवदाम्पत्य फसलं!

(Bhandara Vegetable farmer facing economic problem due to lockdown)

Non Stop LIVE Update
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.