AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजी विकून भज्याचेही पैसे निघेनात, शेतकऱ्यांनी जगायचं कसं?

कोरोना संसर्गात भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला शेताच्या बांधावर सडतोय. Bhandara Vegetable farmer

भाजी विकून भज्याचेही पैसे निघेनात, शेतकऱ्यांनी जगायचं कसं?
भंडाऱ्यातील भाजी उत्पादक शेतकरी अडचणीत
| Updated on: Apr 22, 2021 | 7:28 PM
Share

भंडारा: कोरोना संसर्गात भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला शेताच्या बांधावर सडतोय. भाजी विकून भज्याचे पैसेही निघत नसल्याची जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती आहे. मालाला भाव मिळत नसल्याने शिवाय कोरोनामुळे मजूर आणि मार्केट उपलब्ध नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. (Bhandara Vegetable farmer facing economic problem due to lockdown)

भाजीपाला बांधावर सडत ठेवण्याची वेळ

कोरोना संसर्गात भंडारा जिल्ह्यात भाजीपाला पिकाला भाव मिळत नाही. कोरोनामुळे लागलेल्या संचारबंदीमुळे भाजीपाला पिकाला तोडणीसाठी मजूर मिळत नाही. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला शेताच्या बांधावर सडत ठेवण्याची वेळ भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. मजूर मिळत नसून तसेच भाजीपालाला भाव नसल्याने भाजी विकून भज्याचे पैसेही निघत नसल्याची स्थिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली असून भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

भंडारा जिल्हा तसा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. मात्र, अलीकडे पाण्याच्या उपलब्धतेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेण्यास सुरु केले आहे. आधुनिक तंत्रज्ञात व उपलब्ध बाजारपेठ यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मागील 6-7 वर्षा पासून भाजीपाला पीक घेऊ लागला. मात्र, कोरोनाच्या संसर्ग वाढू लागला लॉक डाउन लागले व भाजीपाला पिकाला भाव मिळेनासा झाला. एकीकडे लॉकडाऊन लागू होऊन संचारबंदी केल्याने भाजीपाला तोडण्यास मजूर मिळेनासे झाले आहेत. तर दुसरीकडे उत्पादन केलेल्या मालाला भाव मिळत नसल्याने तोडणी खर्च परवडत नसल्याने भाजीपाला पीक शेताच्या बांधावर सडत ठेवण्याची वेळ जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.

वांगी 5 रुपये किलो भेडी 10 रुपये किलो

ठोक दरात वांगी 5 रु किलो,भेंडी दहा रुपये किलो,कारले 12 रु किलो,टोमैटो 4 रु किलो,चवळी 10 रु किलो अशा कमी दरात विकली जात असल्याने दहा किलो वांगी विकुन भजी खाण्याइतके पैसे निघत नसल्याने जिल्ह्यातील भाजीपाला पीक घेणारा शेतकरी चिंतेत सापडला आहे. तोडणीची मजुरी, वाहतुकीचा खर्च व बाजारातील भाव यांचे गणित लागत नसल्याने शेतात भाजीपाला पिक सडू देण्याशिवाय पर्याय शेतकऱ्यांना नसल्याची परिस्थिती असल्याचं जांब येथील किरण अतकरी या भाजीपाला पीक उत्पादक शेतकऱ्यांनं सांगितलं आहे.

कोरोना संसर्गाचा फटका राज्यातील सर्वच क्षेत्राला बसला असल्याचे चित्र उभे असताना आता त्याची झळ शेतकऱ्यांला बसत असल्याचे समोर येऊ लागले आहे. त्यामुळे इतरांप्रमाणे शेतकऱ्यांना देखील मदत द्यावी, असं कुँवर श्रीपात्रे यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

मुंबई, ठाण्यातील शाळा बंद, मग उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थी-पालकांची काळजी सरकारला नाही का? भाजपचा सवाल

BHARAT BAND | शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’चा देशभरात परिणाम, कुठे परिक्षा रद्द, रेल्वे अडवल्या, तर कुठे नवदाम्पत्य फसलं!

(Bhandara Vegetable farmer facing economic problem due to lockdown)

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.