AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजी विकून भज्याचेही पैसे निघेनात, शेतकऱ्यांनी जगायचं कसं?

कोरोना संसर्गात भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला शेताच्या बांधावर सडतोय. Bhandara Vegetable farmer

भाजी विकून भज्याचेही पैसे निघेनात, शेतकऱ्यांनी जगायचं कसं?
भंडाऱ्यातील भाजी उत्पादक शेतकरी अडचणीत
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Apr 22, 2021 | 7:28 PM
Share

भंडारा: कोरोना संसर्गात भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला शेताच्या बांधावर सडतोय. भाजी विकून भज्याचे पैसेही निघत नसल्याची जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती आहे. मालाला भाव मिळत नसल्याने शिवाय कोरोनामुळे मजूर आणि मार्केट उपलब्ध नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. (Bhandara Vegetable farmer facing economic problem due to lockdown)

भाजीपाला बांधावर सडत ठेवण्याची वेळ

कोरोना संसर्गात भंडारा जिल्ह्यात भाजीपाला पिकाला भाव मिळत नाही. कोरोनामुळे लागलेल्या संचारबंदीमुळे भाजीपाला पिकाला तोडणीसाठी मजूर मिळत नाही. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला शेताच्या बांधावर सडत ठेवण्याची वेळ भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. मजूर मिळत नसून तसेच भाजीपालाला भाव नसल्याने भाजी विकून भज्याचे पैसेही निघत नसल्याची स्थिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली असून भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

भंडारा जिल्हा तसा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. मात्र, अलीकडे पाण्याच्या उपलब्धतेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेण्यास सुरु केले आहे. आधुनिक तंत्रज्ञात व उपलब्ध बाजारपेठ यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मागील 6-7 वर्षा पासून भाजीपाला पीक घेऊ लागला. मात्र, कोरोनाच्या संसर्ग वाढू लागला लॉक डाउन लागले व भाजीपाला पिकाला भाव मिळेनासा झाला. एकीकडे लॉकडाऊन लागू होऊन संचारबंदी केल्याने भाजीपाला तोडण्यास मजूर मिळेनासे झाले आहेत. तर दुसरीकडे उत्पादन केलेल्या मालाला भाव मिळत नसल्याने तोडणी खर्च परवडत नसल्याने भाजीपाला पीक शेताच्या बांधावर सडत ठेवण्याची वेळ जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.

वांगी 5 रुपये किलो भेडी 10 रुपये किलो

ठोक दरात वांगी 5 रु किलो,भेंडी दहा रुपये किलो,कारले 12 रु किलो,टोमैटो 4 रु किलो,चवळी 10 रु किलो अशा कमी दरात विकली जात असल्याने दहा किलो वांगी विकुन भजी खाण्याइतके पैसे निघत नसल्याने जिल्ह्यातील भाजीपाला पीक घेणारा शेतकरी चिंतेत सापडला आहे. तोडणीची मजुरी, वाहतुकीचा खर्च व बाजारातील भाव यांचे गणित लागत नसल्याने शेतात भाजीपाला पिक सडू देण्याशिवाय पर्याय शेतकऱ्यांना नसल्याची परिस्थिती असल्याचं जांब येथील किरण अतकरी या भाजीपाला पीक उत्पादक शेतकऱ्यांनं सांगितलं आहे.

कोरोना संसर्गाचा फटका राज्यातील सर्वच क्षेत्राला बसला असल्याचे चित्र उभे असताना आता त्याची झळ शेतकऱ्यांला बसत असल्याचे समोर येऊ लागले आहे. त्यामुळे इतरांप्रमाणे शेतकऱ्यांना देखील मदत द्यावी, असं कुँवर श्रीपात्रे यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

मुंबई, ठाण्यातील शाळा बंद, मग उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थी-पालकांची काळजी सरकारला नाही का? भाजपचा सवाल

BHARAT BAND | शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’चा देशभरात परिणाम, कुठे परिक्षा रद्द, रेल्वे अडवल्या, तर कुठे नवदाम्पत्य फसलं!

(Bhandara Vegetable farmer facing economic problem due to lockdown)

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर