AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chilly Prices : मिरचीने बदलले बाजारपेठेतले सुत्र, साताऱ्यात लवंगी मिरचीचा तडका

अतिवृष्टी आणि बदलेल्या वातावरणाचा फटका सर्वच पिकांना बसलेला असला तरी मिरचीच्या केवळ उत्पादनातच वाढ झाली नाही तर बाजारपेठेत आवक वाढूनही दर हे चढेच आहेत. बाजारात शेतीमालाची आवक वाढली की दर कमी होणार हे सुत्रच आहे पण याला देखील मिरचीने छेद दिला आहे. यापूर्वी नंदुरबार बाजारपेठेत विक्रमी दर मिळाला होता तर आता सातारा बाजारपेठेत लवंगी मिरचीच्या दरात तब्बल 80 रुपयांची वाढ झालेली आहे.

Chilly Prices : मिरचीने बदलले बाजारपेठेतले सुत्र, साताऱ्यात लवंगी मिरचीचा तडका
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 12:54 PM
Share

सातारा : अतिवृष्टी आणि बदलेल्या वातावरणाचा फटका सर्वच पिकांना बसलेला असला तरी (chilly prices) मिरचीच्या केवळ उत्पादनातच वाढ झाली नाही तर (Satara Market) सातारा बाजारपेठेत आवक वाढूनही दर हे चढेच आहेत. बाजारात शेतीमालाची आवक वाढली की दर कमी होणार हे सुत्रच आहे पण याला देखील मिरचीने छेद दिला आहे. यापूर्वी नंदुरबार बाजारपेठेत विक्रमी दर मिळाला होता तर आता सातारा बाजारपेठेत लवंगी मिरचीच्या दरात तब्बल 80 रुपयांची वाढ झालेली आहे. दर वाढूनही मागणी वाढत आहे हे विशेष.

सातारा बाजारपेठेत 4 प्रकारच्या मिरचीचा ठसका

आता सर्वच बाजारपेठेत मिरच्यांची आवक सुरु झाली आहे. पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. परिणामी मिरचीची आवक वाढत आहे. असे असले तरी दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. शिवाय दरात वाढ होत आहे. लवंगी मिरचीच्या दरामध्ये तर 70 ते 80 रुपयांनी वाढ झाली आहे. गतवर्षी उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे यंदा मागणीत वाढ होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणने आहे. सातारा बाजारपेठेत बेडगी मिरची 320 रुपये किलो, शंकेश्वरी मिरची- 200, गटूर मिरची- 165, लवंगी मिरची 180 ते 200 रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे.

अवकाळीचा परिणाम पण आवकमध्ये वाढच

अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे मिरची तोडल्यानंतर वाळवण करताना शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. पण याचा थेट परिणाम हा उत्पादनावर झालेला नाही. यापूर्वी नंदुरबार बाजारात चालू महिन्यात आतापर्यंत 1 लाख टन लाल मिरचीची आवक झाली आहे. तर दरही 4 हजार क्विंटलपर्यंत मिळालेले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडणार असला तरी मात्र, गेल्या अनेक दिवसानंतर कोणत्या तरी शेतीपिकाला चांगला दर मिळाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.

मिरचीचे दर अन् आवकही विक्रमीच

नंदुरबार बाजार समितीमध्ये लाल मिरचीची आवकही आणि दरही विक्रमीच मिळत आहे. लगतच्या राज्यातील शेतकरी देखील याच बाजारपेठेत मिरची विक्रीसाठी आणत आहेत. डिसेंबर महिन्यात आतापर्यंत 1 लाख टन लाल मिरचीची आवक झाली आहे. तर दरही 4 हजार क्विंटलपर्यंत मिळालेले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडणार असला तरी मात्र, गेल्या अनेक दिवसानंतर कोणत्या तरी शेतीपिकाला चांगला दर मिळाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. येथील बाजारपेठेमध्ये दर हे गेल्या अनेक दिवसांपासून टिकून आहेत. शेतकऱ्यांना येथील दराबाबत खात्री असल्यानेच आवक वाढत असल्याचे बाजार समितीचे सचिव अमृतकर यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Grape : अखेर ठरंल तर मग…! शेतकऱ्यांच्या टाळ्यांचा कडकडाट अन् बागायतदार संघाचा ऐतिहासिक निर्णय, काय झालं नेमंक नाशिकमध्ये

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता ‘या’ दिवशी होणार जमा, एक मेसेज कोट्यावधी लाभार्थ्यांना

आंबा बागांचे नुकसान होऊनही फळपीक विमा योजनेकेडे बागायतदारांची पाठ, काय आहेत कारणे?

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.