AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कापसामध्येही सावकारकी ! तोंडी सौदे करुन शेतकऱ्यांची होतेय लूट

शेतकऱ्यांना शेतीकामासाठी पैशाची आवश्यकता होती. या बदल्यात येथील व्यापाऱ्यांनी कापसाचे पूर्वीच सौदे केले तेही 2500 ते 3000 हजार रुपयांनी. व्यापाऱ्यांनी सौद्याप्रमाणे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी पैसेही देऊ केले होते पण आता कापसाचे दर वाढले असूनही त्याच सौद्यानुसार कापसाची खरेदी करणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

कापसामध्येही सावकारकी ! तोंडी सौदे करुन शेतकऱ्यांची होतेय लूट
संग्रहित
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Oct 24, 2021 | 11:24 AM
Share

यवतमाळ : कापसाला सध्या सोन्याचा भाव मिळत आहे. (Cotton rate increase) शिवाय भविष्यात अजून दर वाढतील असा अंदाज वर्तवला जात आहे. याचाच फायदा काही व्यापारी घेत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहवयास मिळत आहे. (Yawatmal) कारण शेतकऱ्यांना शेतीकामासाठी पैशाची आवश्यकता होती. (cotton bargains at lower rates,) या बदल्यात येथील व्यापाऱ्यांनी कापसाचे पूर्वीच सौदे केले तेही 2500 ते 3000 हजार रुपयांनी. व्यापाऱ्यांनी सौद्याप्रमाणे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी पैसेही देऊ केले होते पण आता कापसाचे दर वाढले असूनही त्याच सौद्यानुसार कापसाची खरेदी करणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे दर वाढ झाली पण कापसामध्ये सावकारकी आल्याने येथेही शेतकऱ्याचीच पिळवणूक होत असल्याचे चित्र आहे. यवतमाळ

जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वडकी आणि दहेगाव बोरी या परिसरात असे प्रकर होत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात विक्रमी कापसाची लागवड केली जाते. तरी यंदा कापसाच्या क्षेत्रात घट होऊन सोयाबीन व इतर पिकाचे उत्पादन वाढले होते. राज्यात यंदा 4 लाखाने कापसाचे क्षेत्र घटले आहे. शिवाय पावसामुळे आणि बोंडआळीमुळे नुकसानही झाले होते.

परिणामी कापसाचे दर आता 10 हजाराच्या घरात गेले आहेत. हमीभाव केंद्र अद्यापही सुरु न झाल्याने शेतकऱ्यांजवळ खासगी व्यापाऱ्यांशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीकामे करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून कापसाचे सौदे करुन कामे केली पण आता ज्याप्रमाणात सौदे झाले होते त्याच दरा कापसाची खरेदी केली जाणार असल्याचे व्यापारी म्हणत आहेत. त्यामुळे जर अशा प्रकारे विक्री करण्याची नामुष्की ओढावली तर क्विंटल मागे 4 ते 5 हजाराचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.

नेमके काय आहे प्रकरण

शेतकरी हे शेती कामासाठी खासगी व्यापाऱ्यांकडून हातऊसणे किंवा शेतीमालाच्या विक्रीवर पैसे घेतात. त्यानुसारच राळेगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी शेतातील कापसाचे सौदे करुन व्यापाऱ्यांकडून पैसे घेतले. त्या दरम्यान, कापसाला एवढ्या मोठ्या प्रमाणात दर नव्हता. आता कापसाचे दर हे 10 हजार क्विंटलच्या घरात गेलेले आहेत. आणि येथील शेतकऱ्यांनी 3 ते 4 हजार क्विंटलप्रमाणे सौदे केले होते. आता दर वाढ होऊनही त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना नाही तर व्यापाऱ्यांनाच होणार आहे. त्याच दरात कापसाची खरेदी केली जाणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.

व्यापाऱ्यांची दादागिरी

व्यापारी आणि शेतकरी यांचे संबंध तसे जिव्हाळ्याचे असतात. मात्र, बाजारात कापसाचे दर वाढत असल्याने व्यापाऱ्यांची नियती बदलली. अधिकचे पैसे कमावण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. कापसाच्या बदल्यात पैसे देतो असे शेतकरी म्हणत असतानादेखील व्यापारी मात्र, कापूस खरेदीवरच अडवूण बसलेले आहेत. काही शेतकऱ्यांनी तर सौद्याप्रमाणे ठरलेल्या दरात कापसाची विक्रीही केली आहे. त्यामुळे दर वाढले तरी ते व्यापाऱ्यांसाठी अशी अवस्था झाली आहे.

शेतकऱ्यांची सावधगिरी महत्वाची

शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी केवळ तोंडी व्यवहार करु नयेत. आता कापसाचे दर वाढत आहेत त्यामुळे कापूस पीक पदरात पडण्यापूर्वीच असे सौदे न करता इतर माध्यमातून हात ऊसणे पैसे घेऊन शेतीकामे करुन घेणे महत्वाचे राहणार आहे. शिवाय येथील शेतकऱ्यांनी आता सहाय्यक निबंधक यांच्याक़डे तक्रार केली असून कारवाईबाबत राळेगावचे उपविभागीय अधिकारी शैलेश शेळके यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिलेले आहे. (Cotton bargaining, farmers looted by Yavatmal traders)

संबंधित बातम्या :

रब्बीसाठी मिळणार नव्या वाणाचे अनुदानीत हरभरा बियाणे ; काय होणार फायदा?

आता नाही मजुरांची चिंता, 8 तासात 80 किलो कापसाची होणार वेचणी

बदलती शेती : मोती लागवडीतून शेतकरी समृध्द, कशी आहे लागवड पध्दत

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका.

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका