AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदलती शेती : मोती लागवडीतून शेतकरी समृध्द, कशी आहे लागवड पध्दत

आजही भारतामध्ये पारंपारिक पध्दतीने शेती केली जाते. वर्षाकाठी दोन हंगाम आणि पीक पध्दतीही तीच. मात्र, काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल आवश्यक आहे. उत्पादन वाढीसाठी एक ना अनेक नव नविन प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. याकरिता उच्च उत्पादने निवडणेही तेवढेच महत्वाचे आहे. यापैकी एक म्हणजे मोती लागवड शेती.

बदलती शेती : मोती लागवडीतून शेतकरी समृध्द, कशी आहे लागवड पध्दत
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 5:48 PM
Share

मुंबई : आजही भारतामध्ये पारंपारिक पध्दतीने शेती केली जाते. वर्षाकाठी दोन हंगाम आणि पीक पध्दतीही तीच. मात्र, काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल आवश्यक आहे. उत्पादन वाढीसाठी एक ना अनेक नव नविन प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. याकरिता उच्च उत्पादने निवडणेही तेवढेच महत्वाचे आहे. यापैकी एक म्हणजे मोती लागवड शेती. ज्या शेतकऱ्यांना पारंपारिक शेतीपेक्षा वेगळे करुन दाखवायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. याचे उत्पादन पध्दती निराळी आहे पण यामधून शेतकरी लाखो रुपये कमावत आहेत. हीच पध्दत आज आपण जाणून घेणार आहोत.

मोती हे एक नैसर्गिक रत्न आहे, जे एका जहाजातून जन्माला आलेले आहे. जहाजाच्या आतील बाहेरील कणांच्या प्रवेशाने मोती हे तयार होतात. मोती तयार होण्यासाठी तब्बल 14 महिन्याचा कालावधी लागतो. तर त्याच्या गुणवत्तेनुसार किंमत ही ठरत असते. एका सामान्य मोत्याची किंमत ही 300 ते 1500 रुपयांपर्यंत असते. त्याचबरोबर डिझाईन केलेल्या मोत्याची किंमत आंतराष्ट्रीय बाजारपेठेत 10 हजारापर्यंतही मिळू शकते.

मोती लागवडीसाठी सध्याचा काळ अनुकूल

मोतीची मार्केट हे बारमाही असते. याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी ही कायम राहिलेली आहे. मोती लागवडीचे फायदे लक्षात आल्यानंतर आता शेतकऱ्यांचा कल याकडे वाढू लागला आहे. नैसर्गिकपेक्षा कृत्रिम लागवडीकडे नवनविन शेतकऱ्यांचा कल आहे. चांगला दर्जा आणि वैज्ञानिक पध्दत तसेच प्रशिक्षण घेऊन जोपासले तर त्यांची लागवड करता येते. याची बाजारात विक्री करुन शेतकरी भरपूर नफा कमावू शकतात. मोत्याच्य लागवडीसाठी सध्याचा काळ म्हणजे ऑक्टोंबर- नोव्हेंबर हाच अनुकूल आहे.

लागवडीसाठी तलावाचा वापर

मोत्याची लागवड ही तलावात केली जाते. लागवडीसाठी जहाजाचा वापर केला जातो. एका अहवालानुसार केवळ लागवडच नाही तर मोत्यांचा रंग, आकार हा देखील आपल्या इच्छेनुसार ठरवता येतो. त्यामुळेच नैसर्गिक मोत्यापेक्षा आता शेतकरी हे कृत्रिम मोती लागवडीकडे लक्ष केंद्रीत करीत आहे.

लागवडीसाठी प्रशिक्षण आवश्यक

ही शेती पध्दती वेगळी आहे. त्यामुळे लागवड करण्यापूर्वी प्रशिक्षण हे गरजेचे आहे. एवढेच नाही तर त्यासाठी वापरण्यात आलेल्या वस्तूंची देखभालही महत्वाची आहे. सुरुवातीला 1000 जहाजांसह मोती तयार करण्याचे काम सुरू करू शकते.

नेमके काय करावे लागणार आहे

याकरिता सर्वप्रथम शेतकऱ्याला जहाजे गोळा करावी लागतील. ही जहाजे नद्या किंवा तलावातून मिळवू शकतात. आजकाल ते बाजारातही उपलब्ध आहे. वापरात आणण्यापूर्वी जहाजे 10 ते 15 दिवस पाण्यात ठेवावी लागतात. त्यानंतर पाण्यातून काढून लागवड केली जाते. लागवड केली म्हणजे सर्वकाही संपले असे नाही तर त्याची काळजी ही घ्यावीच लागणार आहे. (Huge production from pearl cultivation, new opportunities for farmers )

संबंधित बातम्या :

हमीभाव केंद्राबाबत यंदा दुजाभावच, खरीप अंतिम टप्प्यात तरीही निर्णय प्रलंबीत

सोयाबीन दर्जेदार, दर मात्र कवडीमोल, शेतकऱ्यांनो ‘वेट अँड वॅाच’

डबल धमाका ..! शेतकऱ्यांना पी. एम किसान योजनेचे मिळणार दोन हप्ते !

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.