AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wheat Production: वाढत्या उन्हामुळे गव्हाचे उत्पादन घटले पण केंद्राच्या एका निर्णयामुळे नुकसान टळले

पीके बहरात असताना अवकाळी आणि आता काढणीच्या प्रसंगी वाढत्या उन्हाच्या झळा याचा परिणाम गहू उत्पादनावर झाला आहे.सध्या रबी हंगामातील गव्हाच्या काढणी कामे सुरु आहेत. पण वाढत्या उन्हामुळे कालावधी पूर्ण होण्यापूर्वाच गव्हाची काढणी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. काढणी केली नाहीतर गव्हाचे दाणे गळती होत आहेत अन् वेळीपूर्वी कापणीने उत्पादनात घट होत आहे. शेतकरी दुहेरी संकटात सापडला असताना केंद्र सरकारने मोठा आधार दिला आहे.

Wheat Production: वाढत्या उन्हामुळे गव्हाचे उत्पादन घटले पण केंद्राच्या एका निर्णयामुळे नुकसान टळले
यंदा रब्बीत गव्हाच्या उत्पादनात घट झाल्याने दरात वा्ढ झाली आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 20, 2022 | 5:04 AM
Share

मुंबई : पीके बहरात असताना अवकाळी आणि आता काढणीच्या प्रसंगी वाढत्या उन्हाच्या झळा याचा परिणाम गहू उत्पादनावर झाला आहे. सध्या (Rabi Season) रबी हंगामातील (Wheat Harvesting) गव्हाच्या काढणी कामे सुरु आहेत. पण वाढत्या उन्हामुळे कालावधी पूर्ण होण्यापूर्वाच गव्हाची काढणी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. काढणी केली नाहीतर गव्हाचे दाणे गळती होत आहेत अन् वेळीपूर्वी कापणीने (Low productivity ) उत्पादनात घट होत आहे. शेतकरी दुहेरी संकटात सापडला असताना केंद्र सरकारने मोठा आधार दिला आहे. कारण आता 6 टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या गव्हाची खरेदी ही मंडईत केली जाणार आहे.सर्वाधिक गव्हाचे क्षेत्र असलेल्या पंजाबमध्ये दरवर्षी 25 ते 30 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असते. यंदा मात्र, 35 ते 36 अंशावर पारा गेला आहे. त्यामुळे उत्पादनावरही परिणाम होऊ लागला आहे.

असा झाला उत्पादनावर परिणाम

दरवर्षी गव्हाचे उत्पादन घेतल्याने एकरी किती उतारा पडतो हे तर लक्षात येतेच. पंजाबमध्ये पूर्वी गव्हाचे एकरी 20 ते 22 क्विंटल असलेले उत्पादन यंदा मात्र, आता एकरी 14 ते 15 क्विंटलपर्यंत कमी झाले आहे. उत्पादन घटल्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर झाला आहे. हा सर्व बदल वाढत्या उन्हामुळे झाला आहे. कारण वाढलेल्या उन्हामुळे कमी काळात गव्हाचे दाणे हे वाळत आहेत. शिवाय त्याची काढणी न केल्यास दाणे गळण्याचा धोका असतो. त्यामुळे कापणी अनिवार्य झाली आहे. त्यांचे सरंक्षण आणि योग्य दरात विक्री हाच त्यावरील पर्याय आहे.त्यामुळे गहू खरेदीमध्ये तर सूट मिळाली आहेच पण या शिथिलतेनंतर का होईना सरकारने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

राज्य सरकार देणार नुकसानभरपाई

बाजारपेठेत नव्याने दाखल होत असलेला गहू हा परिपक्व झालेला नाही.त्यामुळे उत्पादनावरही त्याचा परिणाम झाला आहे.बहुतांश पीक १५ टक्क्यांनी कमी झाले आहे. नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी केंद्रीय पथक पंजाबमध्ये दाखल झाले होते. जिल्ह्यातील पंधरा टक्के उत्पन्नावर परिणाम आहे. शिवाय खराब झालेला गहू शेतकरी घेऊन आला तरी त्याला माघारी पाठवले जात नाही तर वेगळ्या वर्गात त्याची खरेदी होते. तापमानवाढीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली. राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रति एकर आधारावर नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

संबंधित बातम्या :

Summer Crop: मका पिकाला अमेरिकन लष्करी अळीने घेरले, उत्पादनात घट अन् चाऱ्याचाही प्रश्न

PM kisan Yojna : 11 व्या हप्त्याची उत्सुकता शिघेला, तक्रार निवारण्यासाठीही सरकारने केली सोय

Raju Shetti On Sharad Pawar: शरद पवार ऊस उत्पादकांना आळशी म्हणालेच कसे? त्यांच्या ज्ञानाबाबत माझा गैरसमज, राजू शेट्टींचे आक्षेप काय?

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.