AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला, शेतकरी दुहेरी संकटात

पावसाच्या पाण्याने खराब झाला असल्याने आता तो कांदा या शेतकऱ्यांनी (Farmer) रस्त्यावर फेकला आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला, शेतकरी दुहेरी संकटात
akola farmerImage Credit source: tv9marathi
| Updated on: May 28, 2023 | 10:36 AM
Share

गणेश सोनोने, अकोला : अकोला (Akola) जिल्हात 15 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) कांदा पीकाचं मोठ नुकसान झालं आहे. तर हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या जवळा येथील कांदा उत्पादक शेतकरी सोनटक्के यांनी आपल्या शेतातील कांदा हा रस्त्यावर फेकला आहे. नितीन सोनटक्के यांनी दीड एकरात कांदा पेरला होता. त्यांना दीड एकरातून 300 क्यूँटल कांदा अपेक्षित होता. पण पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पीकाच मोठ झालं आहे. सोनटक्के यांना 50 क्विंटल कांदा झाला आहे. तोही पावसाच्या पाण्याने खराब झाला असल्याने आता तो कांदा या शेतकऱ्यांनी (Farmer) रस्त्यावर फेकला आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. त्यामुळे प्रशासनाने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अनोखे आंदोलन

अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. बागलाण तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांनी स्वतः पाहणी देखील केली. परंतु अद्याप कोणतीही नुकसाभरपाई मिळाली नाही. कांदा पिकाला हमीभाव आणि नाफेडमार्फत बाजार समितीत पारदर्शक खरेदी सुरू करावी यसाठी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी व्यंग चित्रांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले आहे.

शेतकऱ्यांना नेमकं कधी नुकसान भरपाई मिळेल ?

नंदुरबार जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तळोदा तालुक्यात 761 शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे नुकसान झाले होते. मात्र या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना अजूनही मिळालेली नाही आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देणार असल्याचे आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र दोन महिने उलटण्यात आले तरी देखील तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांना नेमकं कधी नुकसान भरपाई मिळेल असा काहीसा प्रश्न आता शेतकरी राजा उपस्थित करू लागला आहे.

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....