AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला, शेतकरी दुहेरी संकटात

पावसाच्या पाण्याने खराब झाला असल्याने आता तो कांदा या शेतकऱ्यांनी (Farmer) रस्त्यावर फेकला आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला, शेतकरी दुहेरी संकटात
akola farmerImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 28, 2023 | 10:36 AM
Share

गणेश सोनोने, अकोला : अकोला (Akola) जिल्हात 15 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) कांदा पीकाचं मोठ नुकसान झालं आहे. तर हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या जवळा येथील कांदा उत्पादक शेतकरी सोनटक्के यांनी आपल्या शेतातील कांदा हा रस्त्यावर फेकला आहे. नितीन सोनटक्के यांनी दीड एकरात कांदा पेरला होता. त्यांना दीड एकरातून 300 क्यूँटल कांदा अपेक्षित होता. पण पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पीकाच मोठ झालं आहे. सोनटक्के यांना 50 क्विंटल कांदा झाला आहे. तोही पावसाच्या पाण्याने खराब झाला असल्याने आता तो कांदा या शेतकऱ्यांनी (Farmer) रस्त्यावर फेकला आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. त्यामुळे प्रशासनाने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अनोखे आंदोलन

अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. बागलाण तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांनी स्वतः पाहणी देखील केली. परंतु अद्याप कोणतीही नुकसाभरपाई मिळाली नाही. कांदा पिकाला हमीभाव आणि नाफेडमार्फत बाजार समितीत पारदर्शक खरेदी सुरू करावी यसाठी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी व्यंग चित्रांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले आहे.

शेतकऱ्यांना नेमकं कधी नुकसान भरपाई मिळेल ?

नंदुरबार जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तळोदा तालुक्यात 761 शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे नुकसान झाले होते. मात्र या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना अजूनही मिळालेली नाही आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देणार असल्याचे आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र दोन महिने उलटण्यात आले तरी देखील तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांना नेमकं कधी नुकसान भरपाई मिळेल असा काहीसा प्रश्न आता शेतकरी राजा उपस्थित करू लागला आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.