AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रामीण भागातील शेतीच्या कामाला वेग, बदलत्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत

रब्बी हंगामात पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कारल्याचे आंतरपीक घेतल्याने शेतकऱ्याला त्याचा चांगलाचं फायदा झाला आहे. भरघोस पीक, शेतीच्या पहिल्याच प्रयोगात कडू कारल्याने पवन मावळातील शेतकऱ्याचे तोंड गोड केलंय.

ग्रामीण भागातील शेतीच्या कामाला वेग, बदलत्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत
farmer puneImage Credit source: tv9marathi
| Updated on: May 29, 2023 | 9:53 AM
Share

परळी : परळी (parali) तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाळा (rain update) तोंडावर आला असून शेतीची कामे करण्यास वेग आला आहे. शेतीची मशागत, पाळी घालने, धसकट विचणे आदी कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. अनावश्यक तण उगवणार नाही याची देखील शेतकऱ्यांनी काळजी घेतली आहे. मात्र याचबरोबर आवश्यकतेनुसार शेतात पाणी साठवणे व निचरा होण्याची व्यवस्था करणे, यासाठी बांधबंदिस्ती करण्यात येत आहे. पावसाळा तोंडावर आला असून पावसाळ्यापूर्वीच्या शेतीच्या कामाला वेग आला आहे. सध्या शेतातील कामे (maharashtra farmer news) करण्यासाठी मजूर मिळेनासे झाले असल्याने घरातील सर्व जण एकत्र येऊन शेतात कामे करत आहेत.

भाताच्या आगारात कडू कारले पीक जोमात

रब्बी हंगामात पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कारल्याचे आंतरपीक घेतल्याने शेतकऱ्याला त्याचा चांगलाचं फायदा झाला आहे. भरघोस पीक, शेतीच्या पहिल्याच प्रयोगात कडू कारल्याने पवन मावळातील शेतकऱ्याचे तोंड गोड केलंय. या मालाला चाकण, पुणे मार्केटयार्ड, लोणावळा, देहूरोड, पिंपरी-चिंचवड मार्केटमध्ये चांगली मागणी आली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला त्याचा चांगला फायदा झाला आहे.

शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली

नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात मध्यरात्री जोरदार अवकाळी पावसाची हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतीतून काढून ठेवलेला माल आणि चारा याचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर गेल्या काही दिवसापासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. रात्री तोरणमाळ आणि मोलगी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसामुळे घराचं नुकसान देखील होण्याची शक्यता आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यावर्षी हवामान खात्याने 16 जूनपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. परंतु अधून-मधून येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी मोठे अडचण निर्माण होणार आहे, तर शेतकऱ्यांमध्ये वेळेवर पाणी पाऊस पडणार का असा संभ्रम आहे.

मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळं शेतकरीवर्ग पुरता हतबल झाला असून शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्याला अक्षरश: ताशी 40 पेक्षा अधिक वेगानं आलेल्या वादळानं झोडपून काढलं. त्यातच मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. धनाच्या लोंब्या जमीनदोस्त झाल्या आहेत. तर, या अवकाळी पावसामुळे फळबाग आणि पालेभाज्यांची शेती ही नष्ट झाल्याने शेतकरी आता आर्थिक संकटात सापडले आहेत.

Follow Us
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.