AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वादळी वाऱ्यामुळे शेतीसह घरांचे मोठे नुकसान, जनावरांचे गोठे उद्धवस्त

आमगाव तालुक्यातील जामखारी आणि बिरसी गावाला मोठा फटका बसला आहे. एक मुलगा जखमी मात्र वादळी वाऱ्यामुळे कोणतीही जीवितहानी नाही. लवकरात लवकर पंचनामे करावे शेतकरी आणि आमदारांची मागणी केली आहे.

वादळी वाऱ्यामुळे शेतीसह घरांचे मोठे नुकसान, जनावरांचे गोठे उद्धवस्त
gondia farmerImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 29, 2023 | 7:58 AM
Share

गोंदिया : जिल्ह्याच्या आमगाव (Aamgaon) तालुक्यातील अनेक गावांना सायंकाळी आलेल्या अवघ्या वीस मिनिटाच्या वादळी वाऱ्यामुळे अनेक घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अनेक घरांची टीनाची छपरे उडाली, गावातील अनेकांची जनावरांची गोठे (unseasonal rain) कोसळली असल्याचे दिसून आले आहे. एवढेच नाही तर या वादळी वाऱ्यामुळे एक लहान मुलं सुद्धा जखमी झालं आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे शेतात कापणी (gondia farmer news) करून ठेवलेले धान हे हवेत उडाल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे शेतातील धान पिकांबरोबर शेतातील अनेक झाडे कोलमडून पडली. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी आता अडचणीत सापडला आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील जामखारी या गावाला वादळी वाऱ्याचा तडाखा बसला असून शेतकऱ्यांचे व गावकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र या चक्रीवादळामुळं कुठलीही जीवितहानी झाली नाही. आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहशराम कोरोटे यांनी जामखारी या गावाला भेट दिली असून तहसीलदारांना लवकर पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाकडून लवकरात लवकर भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे आमदार कोरोटे यांनी सांगितले.

सोलापूरच्या माढ्यातील भुताष्टे गावात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामध्ये जरीचंद्र व्यवहारे या शेतकऱ्याची दीड एकर केळीची बाग भुईसपाट झाली आहे. यात शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकरी व्यवहारे यांनी केली आहे.

मागच्या दिवसांपासून राज्यातील जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस सुरु आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांची डोकेदुखी चांगली वाढली आहे.

Follow Us
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....