AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ई-केवायसी आता कृषी विभाग करणार, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे हप्ते…

मुक्ताईनगर : तालुक्यात केवायसी झालेली नसल्याने ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे हप्ते नियमित मिळत नाहीत, त्यांची ई- केवायसी आता कृषी विभागाच्या मार्फत केली जाणार आहे. मुक्ताईनगर तालुका कृषी अधिकारी माहिती देण्यात आली

ई-केवायसी आता कृषी विभाग करणार, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे हप्ते...
JALGAON EKYCImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jun 24, 2023 | 1:51 PM
Share

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर (muktainagar) तालुक्यात एकूण २३ हजारपेक्षा अधिक पीएम किसान सन्मान निधी (PM-Kisan Samman Nidhi) योजनेचे लाभार्थी आहेत. त्यापैकी सुमारे ३,६५२ शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप झालेली नाही. त्याचबरोबर १७२६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांसोबत आधार लिंक झालेले नाही. त्यामुळे लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांची ई-केवायसी (e-kyc) या योजनेत अनेक बोगस लाभार्थी लाभ घेत असल्याचं उघडकीस आलं आहे. त्याबरोबर खरे शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहेत. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नाही. त्यांची ई-केवायसी करण्याचं काम तालुका कृषी अधिकारी माळी यांना देण्यात आली आहे. कृषी अधिकारी सध्या त्या कामाला जोरात लागले आहेत. कृषी कर्मचाऱ्यांना गावागावात ई-केवायसी करून घ्यायची आहे.

ई-केवायसी का महत्त्वाची आहे ?

पीएम किसान योजनेचा फायदा खऱ्या शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी शासनाच्यावतीने ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांची केवायसी झाली असेल त्याचं शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे हप्ते नियमित मिळणार आहेत.

बँक खात्यासोबत आधार लिंक सुद्धा आवश्यक

बँक खात्यासोबत आधार लिंक सुद्धा आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पीएम किसानसाठी नोंदणी करताना जो बँक खाते क्रमांक दिला आहे. त्या खात्यांसोबत बँकेत जाऊन आधार लिंक करणे आवश्यक आहे. पीएम किसान योजनेचे काम आता कृषी विभागाला देण्यात आले आहे. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. दुष्काळ सदृश परिस्थितीत पीएम किसानचा निधी शेतकऱ्यांना साहाय्यभूत ठरेल. शेतकऱ्यानी ई-केवायसी आणि आधार लिंक न केल्यास हप्ता मिळणार नाही. महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांची ईकेवायसी करायची अजून बाकी आहे.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार