AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हातातोंडाशी आलेली मिरची गेली, आता वर्षभर काय खाणार?; सीताराम महाले या मिरची उत्पादकाचा सवाल

मंगरूळपीर तालुक्यातील रुई परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. वनोजा परिसरात वादळी वाऱ्यावरसह हलक्या स्वरूपाची गारपीट झाली. यामध्ये वनोजा येथील शेतकरी यांच्या लिंबू फळबागेचे नुकसान झाले.

हातातोंडाशी आलेली मिरची गेली, आता वर्षभर काय खाणार?; सीताराम महाले या मिरची उत्पादकाचा सवाल
| Edited By: | Updated on: Mar 19, 2023 | 1:26 PM
Share

वाशिम : मागील चार दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत आहे. तसेच शनिवारी आणि शुक्रवारी जिल्ह्यात गारपिटीनं प्रचंड थैमान घातलं. त्यामुळं रब्बी गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला पिकांसह निंबू, डाळिंब बागांचं अतोनात नुकसान झालंय. या नुकसानीमुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मंगरूळपीर तालुक्यातील रुई परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. वनोजा परिसरात वादळी वाऱ्यावरसह हलक्या स्वरूपाची गारपीट झाली. यामध्ये वनोजा येथील शेतकरी यांच्या लिंबू फळबागेचे नुकसान झाले.

दोन लाख रुपयांचे नुकसान

कलंबा महाली येथील शेतकरी सीताराम महाले याच्या शेतात दोन एकर मिरचीची लागवड केली होती. ऐन तोडणीवर आलेल्या या मिरची पिकाचं काल सायंकाळी झालेल्या गारपिटीने अतोनात नुकसान झालं. उभ्या मिरचीच्या झाडाला पानंसुद्धा गळून पडले आहे. या पिकातून सीताराम महाले याना 50 हजार खर्च वगळता दोन ते अडीच लाख रुपयांच उत्पन्न होणार होतं. मात्र या गारपिटीने नुकसान झालं. आम्हाला पंचनामे करून मदत करा, असे शेतकरी सांगत आहेत.

सोलर पॅनलही खराब

वादळी वाऱ्यामुळे झाडाचे लिंबू मोठ्या प्रमाणात खाली पडले. तसेच बीजवाई कांद्याचे पीकही खराब होत आहे. काही शेतकऱ्यांचा गहू, हरभरा शेतात उभा असल्यामुळे पाण्याने गहू खराब होत आहे. तसेच शेतकऱ्यांचे वादळी वाऱ्यामुळे सोलर पॅनलही खराब झाले आहे.

वर्षभर काय खाणार?

सीताराम महाले म्हणाले, माझी दोन एकर मिरची आहे. ही मिरची जवळपास दोन लाख रुपयांची झाली असती. कालच्या गारपिटीने आणि पावसाने नासधूस झाला. सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा आहे. वर्षभर काय खाणार, अशी समजूत झाली आहे.

आमची हात जोडून विनंती

दुसरा शेतकरी म्हणाला, आमच्या गावात काल भयानक गारपीट झाली. मिरचीचे डांग गळून पडले. हे झाडं आता परत फूल पकडणार नाही. त्यामुळे शासनाने या नुकसानीचे पंचनामे करावे. शेतकऱ्याला भरपाई द्यावी. ही आमची हात जोडून विनंती आहे.

मिरचीला पानसुद्धा राहिले नाही

शेतकरी प्रकाश महाले म्हणाले, कळंबा महाल येथे शेतकऱ्यांचे काल खूप नुकसान झाले. काल गारपिटीचा पाऊस सुरू झाला. निंबाएवढाल्या गारा होत्या. या गारपिटीमुळे मिरचीला पानसुद्धा राहिले नाही. दोन एकर मिरची लावली होती. त्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. फळबाग, लिंबू, संत्रा, बियाचे कांदे यांचे खूप नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावे. सरकारने मदत दिली पाहिजे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.