.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हातातोंडाशी आलेली मिरची गेली, आता वर्षभर काय खाणार?; सीताराम महाले या मिरची उत्पादकाचा सवाल

मंगरूळपीर तालुक्यातील रुई परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. वनोजा परिसरात वादळी वाऱ्यावरसह हलक्या स्वरूपाची गारपीट झाली. यामध्ये वनोजा येथील शेतकरी यांच्या लिंबू फळबागेचे नुकसान झाले.

हातातोंडाशी आलेली मिरची गेली, आता वर्षभर काय खाणार?; सीताराम महाले या मिरची उत्पादकाचा सवाल
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Mar 19, 2023 | 1:26 PM
Share

वाशिम : मागील चार दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत आहे. तसेच शनिवारी आणि शुक्रवारी जिल्ह्यात गारपिटीनं प्रचंड थैमान घातलं. त्यामुळं रब्बी गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला पिकांसह निंबू, डाळिंब बागांचं अतोनात नुकसान झालंय. या नुकसानीमुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मंगरूळपीर तालुक्यातील रुई परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. वनोजा परिसरात वादळी वाऱ्यावरसह हलक्या स्वरूपाची गारपीट झाली. यामध्ये वनोजा येथील शेतकरी यांच्या लिंबू फळबागेचे नुकसान झाले.

दोन लाख रुपयांचे नुकसान

कलंबा महाली येथील शेतकरी सीताराम महाले याच्या शेतात दोन एकर मिरचीची लागवड केली होती. ऐन तोडणीवर आलेल्या या मिरची पिकाचं काल सायंकाळी झालेल्या गारपिटीने अतोनात नुकसान झालं. उभ्या मिरचीच्या झाडाला पानंसुद्धा गळून पडले आहे. या पिकातून सीताराम महाले याना 50 हजार खर्च वगळता दोन ते अडीच लाख रुपयांच उत्पन्न होणार होतं. मात्र या गारपिटीने नुकसान झालं. आम्हाला पंचनामे करून मदत करा, असे शेतकरी सांगत आहेत.

सोलर पॅनलही खराब

वादळी वाऱ्यामुळे झाडाचे लिंबू मोठ्या प्रमाणात खाली पडले. तसेच बीजवाई कांद्याचे पीकही खराब होत आहे. काही शेतकऱ्यांचा गहू, हरभरा शेतात उभा असल्यामुळे पाण्याने गहू खराब होत आहे. तसेच शेतकऱ्यांचे वादळी वाऱ्यामुळे सोलर पॅनलही खराब झाले आहे.

वर्षभर काय खाणार?

सीताराम महाले म्हणाले, माझी दोन एकर मिरची आहे. ही मिरची जवळपास दोन लाख रुपयांची झाली असती. कालच्या गारपिटीने आणि पावसाने नासधूस झाला. सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा आहे. वर्षभर काय खाणार, अशी समजूत झाली आहे.

आमची हात जोडून विनंती

दुसरा शेतकरी म्हणाला, आमच्या गावात काल भयानक गारपीट झाली. मिरचीचे डांग गळून पडले. हे झाडं आता परत फूल पकडणार नाही. त्यामुळे शासनाने या नुकसानीचे पंचनामे करावे. शेतकऱ्याला भरपाई द्यावी. ही आमची हात जोडून विनंती आहे.

मिरचीला पानसुद्धा राहिले नाही

शेतकरी प्रकाश महाले म्हणाले, कळंबा महाल येथे शेतकऱ्यांचे काल खूप नुकसान झाले. काल गारपिटीचा पाऊस सुरू झाला. निंबाएवढाल्या गारा होत्या. या गारपिटीमुळे मिरचीला पानसुद्धा राहिले नाही. दोन एकर मिरची लावली होती. त्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. फळबाग, लिंबू, संत्रा, बियाचे कांदे यांचे खूप नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावे. सरकारने मदत दिली पाहिजे.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर