AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवस-रात्र पाऊस, कांद्याचे नुकसान वाचवण्यासाठी किती धावपळ करणार?; शेतकरी महिला म्हणते,…

नंदुरबार जिल्ह्यात जवळपास १ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील कांद्याचे पीक उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज आहे. नंदुरबार तालुक्याचा पश्चिम पट्टा आणि त्याला लागून असलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते.

दिवस-रात्र पाऊस, कांद्याचे नुकसान वाचवण्यासाठी किती धावपळ करणार?; शेतकरी महिला म्हणते,...
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Mar 19, 2023 | 7:51 AM
Share

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात सलग पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट याचा सर्वाधिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. नंदुरबार आणि लागून असलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सीमावर्ती भागातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीने उद्ध्वस्त झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात जवळपास १ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील कांद्याचे पीक उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज आहे.नंदुरबार तालुक्याचा पश्चिम पट्टा आणि त्याला लागून असलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते.

onian 2 n

किती धावपळ करणार?

या हंगामात लागवड केलेला कांदा काढण्यासाठी तयार असतानाच अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांदा शेतातच आडवा झाल्याने पावसामुळे कांद्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. दिवस-रात्र पाऊस पडतो. कांदाचे नुकसान वाचवण्यासाठी किती धावपळ करणार?, असा सवाल शेतकरी महिलेनं केला.

उत्पादन खर्च निघेना

खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन भांडवल उभं करत शेतात कांद्याची लागवड केली. मात्र निसर्गाच्या रुद्ररूपाने होत्याचं नव्हतं झालं. सरकार देत असलेली नुकसान भरपाई उत्पादन खर्चाइतकीही नसते. त्यामुळे सरकारने मदत करताना कमीत कमी उत्पादन खर्च निघेल इतकी मदत शेतकऱ्यांना द्यावी, अशी अपेक्षा या परिसरातील शेतकरी ज्योतीबाई भोये, लताबाई पवार आणि सुरेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सरकार भरपाई देना पडी

राज्य सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या विचार करत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर कांदा शिल्लक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा कसा मिळणार यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, अशी अपेक्षा शेतकरी करू लागला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकार नुकसान भरपाई देना पडी. कांदा उत्पादन खर्च कसा निगील, अशी आपबिती शेतकरी महिलेनं सांगितली.

उत्पादन खर्च कसा निघेल

पाऊस केव्हा पडेल, काही सांगता येत नाही. कांद्याचं नुकसान कसं वाचवणार असा प्रश्न पडतो. बियाणं, जमिनीची मशागत, मजुरी, खतं यासाठी बरेच पैसे खर्च झाले. उत्पादन खर्च निघेनासा झाला. त्यात कांद्याला भाव नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणित सापडला आहे.

Follow Us
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा....
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा.....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर.....
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.