AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवस-रात्र पाऊस, कांद्याचे नुकसान वाचवण्यासाठी किती धावपळ करणार?; शेतकरी महिला म्हणते,…

नंदुरबार जिल्ह्यात जवळपास १ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील कांद्याचे पीक उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज आहे. नंदुरबार तालुक्याचा पश्चिम पट्टा आणि त्याला लागून असलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते.

दिवस-रात्र पाऊस, कांद्याचे नुकसान वाचवण्यासाठी किती धावपळ करणार?; शेतकरी महिला म्हणते,...
| Edited By: | Updated on: Mar 19, 2023 | 7:51 AM
Share

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात सलग पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट याचा सर्वाधिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. नंदुरबार आणि लागून असलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सीमावर्ती भागातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीने उद्ध्वस्त झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात जवळपास १ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील कांद्याचे पीक उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज आहे.नंदुरबार तालुक्याचा पश्चिम पट्टा आणि त्याला लागून असलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते.

onian 2 n

किती धावपळ करणार?

या हंगामात लागवड केलेला कांदा काढण्यासाठी तयार असतानाच अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांदा शेतातच आडवा झाल्याने पावसामुळे कांद्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. दिवस-रात्र पाऊस पडतो. कांदाचे नुकसान वाचवण्यासाठी किती धावपळ करणार?, असा सवाल शेतकरी महिलेनं केला.

उत्पादन खर्च निघेना

खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन भांडवल उभं करत शेतात कांद्याची लागवड केली. मात्र निसर्गाच्या रुद्ररूपाने होत्याचं नव्हतं झालं. सरकार देत असलेली नुकसान भरपाई उत्पादन खर्चाइतकीही नसते. त्यामुळे सरकारने मदत करताना कमीत कमी उत्पादन खर्च निघेल इतकी मदत शेतकऱ्यांना द्यावी, अशी अपेक्षा या परिसरातील शेतकरी ज्योतीबाई भोये, लताबाई पवार आणि सुरेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सरकार भरपाई देना पडी

राज्य सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या विचार करत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर कांदा शिल्लक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा कसा मिळणार यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, अशी अपेक्षा शेतकरी करू लागला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकार नुकसान भरपाई देना पडी. कांदा उत्पादन खर्च कसा निगील, अशी आपबिती शेतकरी महिलेनं सांगितली.

उत्पादन खर्च कसा निघेल

पाऊस केव्हा पडेल, काही सांगता येत नाही. कांद्याचं नुकसान कसं वाचवणार असा प्रश्न पडतो. बियाणं, जमिनीची मशागत, मजुरी, खतं यासाठी बरेच पैसे खर्च झाले. उत्पादन खर्च निघेनासा झाला. त्यात कांद्याला भाव नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणित सापडला आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.