AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रब्बी हंगामातील पिकांची काळजी अन् कांदा लागवडीबाबत कृषी तज्ञांचा काय आहे सल्ला?

वातावरणातील बदलाचा परिणाम रब्बी हंगामातील कडधान्यावर देखील जाणवू लागलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण केले तर उत्पादनात वाढ होणार आहे. कारण यंदा सर्वकाही पोषक असताना गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने मोहरीवर चापा किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे या रोगाची लक्षणे आढळून येताच वेळेचे महत्व जाणून शेतकऱ्यांनी लागलीच पिकाच्या ज्या भागामध्ये लागण झाली आहे तो भाग काढून टाकणे महत्वाचे आहे.

रब्बी हंगामातील पिकांची काळजी अन् कांदा लागवडीबाबत कृषी तज्ञांचा काय आहे सल्ला?
रब्बी हंगामामध्ये पीक पध्दतीमध्ये बदल झाला असून शेतकऱ्यांनी तेलबियांवर भर दिला आहे
| Edited By: | Updated on: Jan 12, 2022 | 3:19 PM
Share

मुंबई : वातावरणातील बदलाचा परिणाम (Rabi Season) रब्बी हंगामातील कडधान्यावर देखील जाणवू लागलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण केले तर उत्पादनात वाढ होणार आहे. कारण यंदा सर्वकाही पोषक असताना गेल्या काही दिवसांपासून (Climate Change) वातावरणात बदल झाल्याने मोहरीवर चापा (pest infestation) किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे या रोगाची लक्षणे आढळून येताच वेळेचे महत्व जाणून शेतकऱ्यांनी लागलीच पिकाच्या ज्या भागामध्ये लागण झाली आहे तो भाग काढून टाकणे महत्वाचे आहे. विशेषत: या किडीचा उद्रेक हा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतो आणि मार्चपर्यंत टिकतो. ही किड वनस्पतींच्या खोडातून, फुलांपासून, पानांमधून आणि नवीन शेंगा पासून रस शोषून समूहाला कमकुवत बनवते. त्यामुळे मोहरी पिकावर बुरशी वाढते तर काही भाग हा चिकट होतो.

तर दुसरीकडे रब्बी हंगामातील हरभरा पिकावर घाटीअळीचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एका एकरामध्ये 3 ते 4 T आकाराचे सापळे लावणे महत्वाचे आहे. यामध्ये किड साठली जाऊन नंतर ती नष्ट करणे महत्वाचे आहे. कोबीच्या पिकात डायमंड बॅक कॅटरपिलर, मटारमध्ये पॉड बोरर्स आणि टोमॅटोमध्ये फ्रूट बोरर्सची काळजी घ्या.

गाजराचे बियाणे बनवण्यासाठी हीच योग्य वेळ

कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले की हा मोसम गाजराचे बियाणे तयार करण्यासाठी योग्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी सुधारित वाणांचे उच्च दर्जाचे बियाणे वापरले आहे गाजराचे पीक 90 ते 105 दिवसाचे झाले आहे त्यांनी या जानेवारी महिन्यात खोदकाम केले तरी बियाणे तयार करता येणार आहे. मात्र, हे करीत असताना लांब गाजर निवडले पाहिजे शिवाय त्याला पानेही कमीच असली पाहिजेत अशाच गाजरांची बिजोत्पादनासाठी निवड करावी लागणार आहे. या गाजरांची पाने 4 इंच सोडून कापून घ्या. गाजराचा वरचा 4 इंचाचा भाग ठेवा आणि उर्वरित कापा. आता 45 सेंमी अंतरावर रांगेत 6 इंच अंतराने त्याची लागवड करुन लागलीच पाणी दिले तर बिजोत्पादन उत्तम पध्दतीने होणार आहे.

अशी करा कांद्याची लागवड

सध्या उन्हाळी हंगामातील कांदा लागवडीचे काम जोमात सुरु आहे. मात्र, लागवड करताना शेतकऱ्यांना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. 6 आठवड्यांपेक्षा अधिकच्याच कालावधीचे रोपांची लागवड करणे गरजेचे आहे. लहान-लहान वाफे तयार करुन लागवड करावीव लागणार आहे जेणेकरुन पाण्याचे नियोजन करता येणार आहे. लागवडीच्या 10-15 दिवस आधी शेतात 20-25 टन सडलेले शेणखत घाला. रोप लागवड करताना काही वेळ पूर्वी 20 किलो नायट्रोजन, 60-70 किलो फॉस्फरस आणि 80-100 किलो पोटॅश लागवड क्षेत्रावर घालावे लागणार आहे. तर रोप अधिक खोलीवर लावयाचे नाही तर दोन वाफ्यांमध्ये 15 सेंमी अंतर आणि दोन रोपांमध्ये 10 सेमी अंतर ठेवणे महत्वाचे आहे.

संबंधित बातम्या :

farmer producer company: आता शेतकरी उत्पादक कंपन्याही करणार तूरीची खरेदी, नेमका फायदा काय?

Rabi Season : शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला पण मुख्य पिकालाच फटका बसला

Grape Growers Association: निर्णय झाला- आता माघार नाही, सोलापूर विभागातही ठरले द्राक्षांचे दर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.