नवी दिल्ली : शेतकरी (Farmers) आणि शेतमजूर दिवसरात्र शेतात राबत असतात. हे काम करत असताना 24 तास त्यांच्यावर अपघात होण्याचा धोका असतो. अशात जर एखाद्या कुटुंबातील काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा किंवा शेतमजुराचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबावरच संकट कोसळतं. या कुटुंबाच्या उपजीविकेचाच प्रश्न तयार होतो. यावर उपाय म्हणून हरियाणा राज्य सरकारने अशा कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी (Financial assistance) मुख्यमंत्री शेतकरी आणि शेतमजूर जीवन सुरक्षा योजना सुरू केली आहे (Mukhyamantri Kisan Khetihar mazdoor jiwan suraksha yojna scheme for farmers in accident by Hariyan Government).
या योजनेनुसार जर शेती काम करत असताना शेती, गाव, बाजार समिती अशा ठिकाणांहून येताना जाताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही मदत बाजार समितीकडून पीडित कुटुंबाला आर्थिक स्वरुपात केली जाईल. त्यामुळेच तुम्ही जर शेतकरी किंवा शेतमजूर असाल तर तुम्ही हे वाचलंच पाहिजे. या योजनेत पोल्ट्री फार्म आणि डेअरीचाही समावेश आहे.
हरियाणा सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं मृत्यू झाल्यास आर्थिक मदतीसाठी पोलीस रिपोर्ट आणि पोस्टमार्टम आवश्यक आहे. जखमी झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्याचं प्रमाणपत्र आणि अवयव तुटल्यास उर्वरित अवयवाचा फोटो जोडावा लागेल. अपघातानंतर पीडित कुटुंबाला आर्थिक मदतीसाठी 2 महिन्याच्या आत अर्ज बाजार समितीच्या सचिवाकडे जमा करावा लागेल. यासाठी शेतकऱ्याचं वय 10 वर्षांपेक्षा कमी किंवा 65 वर्षांपेक्षा अधिक नसावं.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :
Mukhyamantri Kisan Khetihar mazdoor jiwan suraksha yojna scheme for farmers in accident by Hariyan Government