AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा कांदा उत्पादकांना बसला फटका, पण या जिल्ह्यात प्रति क्विंटल अकराशे रुपयांचा भाव

नाशिक भागातील कांदा नांदेडच्या बाजारात येण्या आगोदर स्थानिक शेतकरी कांदा काढून बाजारात नेण्याच्या कामात व्यस्त झाल्याचे चित्र सध्या शेत शिवारात दिसतंय.

Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा कांदा उत्पादकांना बसला फटका, पण या जिल्ह्यात प्रति क्विंटल अकराशे रुपयांचा भाव
onion
| Updated on: Mar 16, 2023 | 1:13 PM
Share

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : कांद्याने (onion crop) यंदा ‘वांदा’ केल्याने कांदा उत्पादक शेतकरी (Farmer) अडचणीत सापडला असताना, नंदुरबार जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या गाव असलेल्या सैताने गावातील शेतकऱ्यांना गारपीठ आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. कांद्याला भाव मिळत नसताना अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जेरीस आणले आहे. सैताने येथील शेतकरी प्रमोद पाटील यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रावरील कांद्याच्या पिकात मेंढ्या चरण्यासाठी सोडल्या कांद्याचा उत्पादन खर्च निघणार नसल्याने शेतकऱ्याने हे पाऊल उचलले आसल्याचे सांगितले जात आहे.

कांद्याला प्रति क्विंटल सातशे ते अकराशे रुपयांचा भाव

राज्यातील कांद्याच्या मुख्य बाजारपेठेत कांद्याच्या भावावरून वांधे सुरू आहेत. पण इकडे नांदेडमध्ये सध्या कांद्याला प्रति क्विंटल सातशे ते अकराशे रुपयांचा भाव मिळतोय. त्यामुळे लासलगावचा कांदा येण्यापूर्वी हा भाव मिळवण्यासाठी नांदेडमध्ये कांदा उत्पादक शेतकरी कांदा काढणीत व्यस्त झाला आहे. नाशिक भागातील कांदा नांदेडच्या बाजारात येण्या आगोदर स्थानिक शेतकरी कांदा काढून बाजारात नेण्याच्या कामात व्यस्त झाल्याचे चित्र सध्या शेत शिवारात दिसतंय.

नाफेड मार्फत प्रथमच लाल कांद्याची खरेदी

कांद्याचे बाजार भाव 2 ते 4 रुपये किलोपर्यंत कोसळल्यानंतर हवालदील झालेला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेड मार्फत प्रथमच लाल कांद्याची खरेदी शेतकरी प्रोडूसर कंपन्या मार्फत 27 फेब्रुवारी पासून सुरु करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी 870 रुपये इतका तर दररोज वाढत पंधरा दिवसात 1048 रुपये इतका बाजार भाव देण्यात येत आहे. कागदपत्रांच्या अटी व शर्तींमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद दिसून आल्याने शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

सध्या राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु असल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. रबी पिकाचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी सरकारी मदतीची वाट पाहत आहेत.

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.